Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती; जाणून घ्या लष्करी ताकदीमध्ये कोण आहे वरचढ?

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने भारत-पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. दरम्यान दोन्ही देशांच्या लष्करी ताकदीची चर्चा होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 24, 2025 | 11:11 PM
Pahalgam Terror Attack, clash between India and Pakistan Know who has how much military power

Pahalgam Terror Attack, clash between India and Pakistan Know who has how much military power

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील थंडावलेले संबंध पुन्हा एकदा चिघळले आहेत. यामुळे पुन्हा एकदा दोन्ही देशाच्या लष्करी ताकदीची चर्चा होत आहे. मंगळवारी (22 एप्रिल) जम्मू-काश्मीर येथील पर्यटने स्थळ पहलगामच्या बैसरन खोऱ्यात 5-6 दहशतवाद्यांनी पर्टकांवर गोळीबार केला. या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी झाले. धक्कादायक बाब म्हणजे लोकांना त्यांचा धर्म विचारुन त्यांना ठार करण्यात आले. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (TRF) ‘द रेझिस्टंट फ्री’ ने घेतली आहे.

दरम्यान या हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. परंतु या हल्ल्याचा कट पाकिस्तानच्या रावेलकोटमध्ये रचाला गेला असल्याचे म्हणण्यात येत आहे. दरम्यान पाकिस्तानने या हल्ल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली. यामध्ये पाकिस्तानने मृत झालेल्यांबद्दल शोक व्यक्त केला आणि कुटुंबियांबद्दल सहानुभूती व्यक्त केली. यामध्ये दहशतवादी संघटनेचा उल्लेखही नव्हता. यामुळे पाकिस्तानचे दुप्पटी धोरण उघड होते. यामागचे कारणे म्हणेज पाकिस्तानमधून दहशतवाद्यांना पाठिंबा आणि प्रशिक्षण दिले जात असल्याचा आरोप गेल्या अनेक दशकांपासून होत आहे.

पाकिस्तानच्या अधिकाऱ्याचा उच्चायुक्तालयात केक घेऊन जातानाचा VIDEO व्हायरल; प्रश्न विचारताच वळली बोबडी

याच दरम्यान भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई करत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादविरोधी कारवाईसाठी ठोस पाऊल उचलत नाही तोपर्यंत सिंधू जल कराराला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच देशातील पाकिस्तानींना 48 तांसात देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय पाकिस्तानीन नागरिकांना भारतीय व्हिसा देखील बंद करण्यात आला आहे.

याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने देखील काही निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. पाकिस्तानने भारतासोबतच व्यापार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्ताने देखील त्यांच्या येथील भारतीय उच्चायुक्तलयातील अधिकाऱ्यांना भारतात जाण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानने भारताप्रमाणेच अटारी-वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानमधील भारतीयांचा व्हिसा रद्द केले आहे. तसेच त्यांना भारतात परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सध्या दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असून युद्धची शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर दावे केले जात आहे की, पाकिस्तान लष्करी हल्ल्याच्या तयारीत आहे. यामुळे पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर (LoC) हाय अलर्ट जारी केला आहे. भारताकडून संभाव्य प्रत्युत्तरात्मक कारवाईच्या पार्श्वभूमीवर या हालचाली सुरु असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान एक प्रश्न उपस्थित होतो की, कोणाकडे किती लष्करी ताकद आहे?

किती आहे पाकिस्तानची लष्करी ताकद?

ग्लोबल फायरपॉवर इंडेक्सच्या 2025 च्या अहवालानुसार, पाकिस्तानची लष्करी ताकद कमी आहे. 2023 मध्ये सातव्या क्रमांकावर असलेला पाकिस्तान टॉप 10 लिस्टमधून बाहेर पडला आहे. सध्या पाकिस्तान लष्करी ताकदीमध्ये 12 व्या स्थानावर आहे. याउलट भारताची लष्करी ताकद वाढली असून भारत चौथ्या क्रमांकाच शक्तिशाली देश आहे.

सैन्य ताकद-

दोन्ही देशांच्या सैनिकांच्या संखेबद्दल बोलायचे झाल्यास भारताकजे सध्या 14.55 लाख सक्रिय सैन्यबळ आहे. बारत यामध्ये दुसऱ्या स्थानी आहे. राखीव दलामध्ये बारताकडे 11.55 लाख सैन्यबळ आहे. याउलट पाकिस्तानकडे केवळ 6.54 लाख सक्रिय सैन्य असून 5.5 लाख राखीव सैन्यबळ आहे. पाकिस्तानकडे भारतापेक्षा कमी निमलष्करी दल आहे. भारत सैन्यबळातच नव्हे तर प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानातही आघाडीवर आहे.

लष्करी ताकद –

भारताकडे 4 हजार 201 रणगाडे, ज्यामध्ये टी-90 भीष्म आणि अर्जून सारख्या रणगाड्यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानकडे सुमारे 2 हजार 627 रणगाडे आहे. यामध्ये ल-खालिद, टी-८०यूडी आणि अल-जरार समाविष्ट आहेत.भारताकडे 1 लाख 48 हजार हून अधिक चिलखती वाहने आहे, मात्र पाकिस्तानकडे याची संख्या खूपच कमी आहे. तसेत स्वयं चलित तोफखानांमध्ये भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे.

हवाई ताकद –

भारताची हवाई ताकद देखील पाकिस्तानपेक्षा अधिक आहे. बारताकडे 2 हजार लढाऊ विमाने आहे, तर पाकिस्तानकडे 1 हजार 399 आहेत. तसेच लढाऊ विमानांमध्ये भारताकडे 513 विमाने आहेत तर पाकिस्तानकडे 328 विमाने आहेत.पाकिस्तानकडे 4 हवाई रणगाडे असून भारताकडे 6 हवाई रणगाडे आहेत. तसेच भारताच्या हवाई दलामध्ये सुखोई, राफेल, मिराज ही अत्याधुनिक विमाने आहेत. तर पाकिस्तानकडे केवळ जेएफ-१७ थंडर, एफ-१६ आणि मिराज आहे.

नौदल ताकद-

भारताकडे दोन विमानवाहू जहाजे आहेत, आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांत. तसेच 239 जहाजांसह भारताचे नौद पाकिस्तानपेक्षा अधिक प्रगत आहे. याशिवाय भारताकडे 18 पाणबुड्या आहेत, तर पाकिस्तानरकडे केवळ 8 आहेत. तसेच पाकिस्तानकडे एकही विमानवाहू जहाज नाही.

अणु ताकद

पाकिस्तानकडे सध्या 150 हून अण्वस्त्रे असल्याचा दावा केला जात आहे. भारताकडे देखील एक मजबूत अण्वस्त्र ढाल आहे. असे असले तरी पाकिस्तानच्या लष्करी सामर्थ्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. विशेष करुन दहशतवादी नेटवर आणि सीमा कारवायांमध्ये पाकिस्तानची भूमिका लक्षात घ्यावी लागेल. भारतापेक्षा पाकिस्तानचे लष्करी सामर्थ्य कमी असले तरी भारताने सावध राहण्याची गरज आहे.

Pahalgam Terror Attack: भारताने सिंधू जल करारला स्थगिती देताच पाकिस्तानही चवताळला; ‘हा’ महत्त्वाचा करार करणार रद्द?

Web Title: Pahalgam terror attack clash between india and pakistan know who has how much military power

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 11:11 PM

Topics:  

  • Pahalgam Terror Attack
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Pakistan चा खरा चेहरा पुन्हा उघड! अल्पवयीन मुलींच्या अपहरण आणि धर्मांतराच्या घटनेत वाढ, अहवलातून धक्कादायक खुलासा
1

Pakistan चा खरा चेहरा पुन्हा उघड! अल्पवयीन मुलींच्या अपहरण आणि धर्मांतराच्या घटनेत वाढ, अहवलातून धक्कादायक खुलासा

Sheikh Hasina च्या प्रत्यार्पणावर मोठी अपडेट समोर; जाणून घ्या भारताची काय आहे भूमिका?
2

Sheikh Hasina च्या प्रत्यार्पणावर मोठी अपडेट समोर; जाणून घ्या भारताची काय आहे भूमिका?

हॉटेल Hilton खरोखरच ‘शापित’? आधी रोनाल्ड रीगन आता Donald Trump! राष्ट्राध्यक्षांवर जीवघेणा हल्ला, परिणाम काय होणार?
3

हॉटेल Hilton खरोखरच ‘शापित’? आधी रोनाल्ड रीगन आता Donald Trump! राष्ट्राध्यक्षांवर जीवघेणा हल्ला, परिणाम काय होणार?

कडक सुरक्षेतही Trump वर हल्ला! भर कार्यक्रमात बंदुकीसह नेमका कसा पोहोचला हल्लेखोर? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
4

कडक सुरक्षेतही Trump वर हल्ला! भर कार्यक्रमात बंदुकीसह नेमका कसा पोहोचला हल्लेखोर? जाणून घ्या इनसाइड स्टोरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.