Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: माजी पाकिस्तानी राजदूत पाक मंत्र्यांवर संतपाले; म्हणाले, ‘भारताकडून…’,

जम्मू आणि काश्मीरयेथील पहलगमामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. या पहलगाम हल्ल्यातच 26 जणांचा मृत्यू झाला आहे. भारताने यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 28, 2025 | 02:53 PM
Pahalgam Terror Attack Pakistan High commissioner of India Abdul Basit slams pakistani ministers

Pahalgam Terror Attack Pakistan High commissioner of India Abdul Basit slams pakistani ministers

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: जम्मू आणि काश्मीरयेथील पहलगमामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. या पहलगाम हल्ल्यातच 26 जणांचा मृत्यू झाला आहे. भारताने यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. यामुळे पाकिस्तान संतप्त झाला असून बेताल विधाने करत आहे. कधी भारताला अणु बॉम्बची धमकी दिली जात आहे, तर कधी युद्धाचे आव्हान दिले जात आहे.

पाकिस्तानच्या मंत्र्यांची बेताल विधाने

अलीकडेच पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान भारताला धमकी दिली होती की, आमची सर्व क्षेपणास्त्रे भारताच्या निशाण्यावरच आहेत.  याशिवाय पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नकवी यांनी देखील बेताल विधान करत म्हटले होते की, भारताने पाकिस्तानविरोधात कोणतेही पाऊल उचलले तर पाकिस्तान युद्धासाठी तयार आहे. शिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देखील भारताचे आरोप फेटाळून लावले आहेत.

शाहबाज यांनी म्हटले आहे की, पहलगाममध्ये जे काही घडले, ते केवळ आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण आहे. आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानचे बिलावल बुट्टो यांनी देखील भारताला मोठी धमकी दिली आहे. त्यांनी सिंधू जल करार स्थगित करण्यावर म्हटले आहे की, भारताची एकतर्फी कृती आम्ही नाकारत आहे. सिंधू नदी आमची आहे आणि आमचीच राहील असे बुट्टो य़ांनी म्हटले आहे .त्यांनी म्हटले की, सिंदू नदीत एकतर पाणी वाहील किंवा त्यांचे रक्त.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Pahalgam Terror Attack: भारताच्या कारवाईने उडाली पाकिस्तानची झोप; कधी चीन तर कधी सौदी-ब्रिटनकडे मागतोय भीक

पाकिस्तानी माजी राजनियत अब्दुल बासित यांनी पाकिस्तानी मंत्र्यांना फटकारले

याच वेळी पाकिस्तानी माजी राजनियत अब्दुल बासित यांनी पाकिस्तानी मंत्र्यांच्या या विधानांवर फटकारले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानी मंत्र्यांनी त्यांचा शत्रू भारताकडून शिकले पाहिजे. युट्यूबवरील एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील प्रत्येक मंत्री चौधरी झाला आहे. कोणीही, कधीही उठून पत्रकार परिषद घेत आहे, जास्त नाही तर किमान तुमच्या शत्रू देश भारताकडून तरी शिकले पाहिजे. भारतात पक्षकार परिषध घेऊन माध्यमांचे लक्ष वेधून घेतले जात नाही. भारतातील सर्वजण एकत्रितपणे कार्य करत आहेत आणि आपले धेय्य साध्यण्याचा प्रयत्न कर आहेत.

बासित यांनी म्हटले आहे की, ‘भारतासाठी पहलगाम हल्ला गंभीर बाब आहे. यामुळे निश्चितच भारताकडून कोणती ना कोणती कारवई केली जाणारच आहे. अशा परिस्थितीत आपण सावधगिरी वाळगून बोलले पाहिजे. बासित पुढे म्हणाले की, पाकिस्तान सरकारने प्रत्येकाला पत्रकार परिषद घेण्याची आणि ममाप्रमाणे बोलण्याची परवानी देऊ नये.

तसेच त्यांनी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्याजा आसिफ यांच्या पत्रकार परिषदेबद्दल देखील आपले मत व्यक्त केले. बासित यांनी म्हटले की, संरक्षण मंत्र्यांनी स्काय न्यूज ला दिलेल्या पत्रकार परिदेत त्यांची बॉडी लॅंग्वेज योग्य नव्हती. कधी ते केस ठीक करत होते, तर कधी इकडे तिकडे खाजवत होते. त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देखील नीट दिली नाहीत. याशिवाय रेल्वेमंत्री हनीफ यांच्या टीका करताना बासित यांनी म्हटले की, त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून त्यांना पत्रकार परिषद घेण्याची परवानगी कोणी दिली.

अशा संकटकालीन परिस्थितीला कसे हाताळायचे याची पंतप्रधानांना देखील कल्पना नाही. याशिवाय त्यांनी गृहमंत्री मोहसीन यांच्यावर देखील निशाणा साधला. त्यांची पत्रकार परिषद अनावश्यक होती असे बासित यांनी म्हटले. त्यांचे पत्रकार परिषदेतील बोलणे अगदी हास्यास्पद होते असे म्हटले आहे. तसेच बासित यांनी म्हटले की, सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये परिस्थिती गंभीर आहे. हे लक्षात घेऊनच पाकिस्तानच्या परराष्ट्री मंत्रालयाने निर्देश जारी केले पाहिजेत. निरर्थक बोलणार्यांना पत्रकार परिषद घेण्याची परवानगी देण्यात येऊ नये असे बासित यांनी म्हटले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Pahalgam Terror Attack: ‘पहलगाम हल्ल्यातील आरोपींना न्यायालयीन कारवाईच्या चौकटीत आणा’; संयुक्त राष्ट्रांची मागणी

Web Title: Pahalgam terror attack pakistan high commissioner of india abdul basit slams pakistani ministers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 02:52 PM

Topics:  

  • Pahalgam Terror Attack
  • pakistan

संबंधित बातम्या

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य
1

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
2

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’
3

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल
4

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.