
pakistan fears india nuclear program pfbr kalpakkam 300 bombs claim 2026
Zahir Kazmi Pakistan tweet on India nuclear : भारताने अणुऊर्जा क्षेत्रात मिळवलेल्या ऐतिहासिक यशाने शेजारील देश पाकिस्तानमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण केली आहे. तामिळनाडूतील कल्पक्कम येथे स्वदेशी बनावटीच्या ‘प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर’ने (PFBR) यशस्वीपणे ‘क्रिटिकॅलिटी’ (Criticality) प्राप्त केली आहे. हे यश भारतासाठी ऊर्जेच्या दृष्टीने वरदान असले तरी, पाकिस्तानला मात्र यामुळे आपल्या अस्तित्वाची भीती वाटू लागली आहे. पाकिस्तानचे सामरिक योजना विभागाचे सदस्य झहीर काझमी यांनी यावर अत्यंत संतापजनक आणि भीतीदायक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अणुभट्टीमध्ये जेव्हा इंधनाची साखळी अभिक्रिया स्थिर होते आणि ती कोणत्याही बाह्य मदतीशिवाय अखंड सुरू राहते, तेव्हा त्याला ‘क्रिटिकॅलिटी’ म्हणतात. झहीर काझमी यांचा आरोप आहे की, या तंत्रज्ञानामुळे भारत आता शस्त्रास्त्र दर्जाच्या प्लुटोनियमचे उत्पादन प्रचंड वेगाने करू शकेल. त्यांच्या दाव्यानुसार, भविष्यात भारत दरवर्षी ३०० हून अधिक अण्वस्त्रे तयार करण्याची क्षमता प्राप्त करेल. भारताचा हा “असुरक्षित” अणुकार्यक्रम पाकिस्तानसाठी आणि जगासाठी धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Iran Trade: चीनचा पत्ता कट! इराणचे तेल 7 वर्षांनंतर येणार भारतात; असे काय घडले की ‘Jaya Tanker’ने दोन वेळा बदलली दिशा?
पाकिस्तान केवळ स्वतःपुरता मर्यादित न राहता आता युरोपीय देशांनाही भारताच्या नावाने घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. काझमी यांनी भारताच्या अग्नी-५ आणि अग्नी-६ क्षेपणास्त्रांचा दाखला दिला आहे. या क्षेपणास्त्रांचा पल्ला ५,००० ते ८,००० किलोमीटरपर्यंत असल्यामुळे ती युरोपच्या केंद्रस्थानी हल्ला करण्यास सक्षम आहेत. “भारताकडे असलेला अण्वस्त्रांचा साठा आणि ही लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे जागतिक स्थिरतेला धक्का लावणार आहेत,” असा कांगावा पाकिस्तानकडून केला जात आहे. त्यांनी भारताला ‘फ्रँकेनस्टाईनचा राक्षस’ अशी उपमा देऊन जागतिक समुदायाने भारतावर निर्बंध घालावेत, असे सुचवले आहे.
THREAD🧵 India’s Nuclear energy achievement The 500 MW Prototype Fast Breeder Reactor (PFBR) at Kalpakkam has attained criticality. India just achieved something monumental in global nuclear energy. → 72 years: Time since Homi Bhabha conceived the plan
→ 22 years: Time to… pic.twitter.com/FFf9akyrvB — Netram Defence Review (@NetramDefence) April 7, 2026
credit – social media and Twitter
पाकिस्तानच्या या नाराजीमागे २००८ मध्ये भारताला मिळालेली ‘एनएसजी सूट’ (NSG Waiver) देखील आहे. काझमी यांच्या मते, या सवलतीमुळे भारताला आपल्या नागरी आणि लष्करी अणुकार्यक्रमात सोयीस्करपणे बदल करता आले, ज्यामुळे आज भारत अण्वस्त्रांच्या शर्यतीत पाकिस्तानच्या खूप पुढे निघून गेला आहे. भारताकडे सध्या ४८० ते २,६०० अण्वस्त्रे तयार करण्यासाठी पुरेसे साहित्य असल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे.
A New Chapter in India’s Nuclear Journey ▶️India has marked a major milestone in its nuclear energy programme. The indigenously designed and built Prototype Fast Breeder Reactor (PFBR) at Kalpakkam in Tamil Nadu successfully attained its first criticality on 6th April 2026,… pic.twitter.com/Snc8DiJDKV — PIB India (@PIB_India) April 7, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Update: सीझफायर केवळ नाटक? करारनंतर अवघ्या काही तासांतच इराणच्या Lavan Islandवर भीषण हल्ला अन् तेलाचा भडका; पाहा VIDEO
वास्तविक पाहता, भारताचा अणुकार्यक्रम हा शांततेच्या हेतूने आणि ऊर्जा स्वावलंबनासाठी आहे. मात्र, पाकिस्तानला नेहमीच भारताच्या प्रगतीमध्ये स्वतःचा विनाश दिसतो. कल्पक्कममधील यश हे भारताला ‘थ्री-स्टेज’ अणुकार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात घेऊन गेले आहे, जे भविष्यात भारताला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करेल. पाकिस्तानचा हा आरडाओरडा केवळ जागतिक लक्ष वेधून घेण्यासाठी आणि भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.
Ans: कारण या तंत्रज्ञानामुळे भारत शस्त्रास्त्रांसाठी लागणाऱ्या प्लुटोनियमचे वेगाने उत्पादन करू शकतो आणि अण्वस्त्रांची संख्या वाढवू शकतो, असा पाकिस्तानचा दावा आहे.
Ans: पाकिस्तानच्या दाव्यानुसार, अग्नी क्षेपणास्त्रांचा पल्ला ८,००० किलोमीटरपर्यंत असू शकतो, ज्यामुळे ती युरोपपर्यंत लक्ष्यभेद करू शकतात.
Ans: कल्पक्कममधील स्वदेशी प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टरने (PFBR) 'क्रिटिकॅलिटी' साध्य केली आहे, जो भारताच्या अणुऊर्जा प्रवासातील मैलाचा दगड आहे.