Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची राष्ट्रीय असेंब्लीची आपत्कालीन बैठक; शाहबाज सरकारला PTIचा पाठिंबा मिळणार का?

Pakistan Assembly urgent meeting : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना पाकिस्तान सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 04, 2025 | 10:32 AM
Pakistan's Assembly meets urgently amid India tension will PTI back Shahbaz

Pakistan's Assembly meets urgently amid India tension will PTI back Shahbaz

Follow Us
Close
Follow Us:

India-Pakistan tensions : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना पाकिस्तान सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ५ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता इस्लामाबादमधील संसद भवनात राष्ट्रीय असेंब्लीची विशेष आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक देशाच्या सुरक्षा यंत्रणांसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

ही बैठक पाकिस्तानचे राष्ट्रपती यांनी बोलावली असून, यात पंतप्रधान शाहबाज शरीफ, लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर, सर्व पक्षांचे नेते, मंत्री, तसेच सुरक्षा तज्ञ सहभागी होणार आहेत. यावेळी भारतासोबत निर्माण झालेला गंभीर तणाव, लष्करी प्रतिक्रिया, घरगुती सुरक्षेची रणनीती, आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न यावर चर्चा होणार असल्याचे समजते.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा कठोर पवित्रा – पाकिस्तानमध्ये खळबळ

काश्मीरमधील पहलगाम येथे घडविण्यात आलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताने पाकिस्तानसोबत सर्व प्रकारचे राजनैतिक संबंध तोडले असून, सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून त्यांना देशाबाहेर पाठवले आहे. याशिवाय, भारताने सिंधू जल करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा करार दशकांपासून दोन्ही देशांमध्ये अस्तित्वात होता, मात्र आता तोही भारताने थांबवला असून, या निर्णयाने पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

हे देखील वाचा : International Firefighters’ Day : कोण आहेत भारताच्या पहिल्या महिला अग्निशामक? वाचा त्यांची प्रेरणादायक कहाणी

पाकिस्तानची वाढती अस्वस्थता, लष्करी हालचाली आणि धमक्या सुरू

भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यासह पाक लष्कर अनेक गुप्त बैठका घेत आहे. तसेच सीमेवर सायरनची यंत्रणा बसवली जात आहे आणि क्षेपणास्त्र चाचण्याही वाढल्या आहेत. बिलावल भुट्टो यांनी तर सिंधू नदीत पाण्याऐवजी रक्त वाहेल, असा उन्मादी इशारा दिला आहे. यावरून पाकिस्तान सरकारची चिंता आणि अस्थैर्य उघडपणे समोर येते.

शाहबाज सरकारच्या अडचणी, पीटीआयचा पाठिंबा मिळणार का?

या महत्त्वाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष आहे ते इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाकडे. सध्या तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या अनुपस्थितीत पीटीआय सरकारविरोधात ठाम आहे. या बैठकीत शाहबाज शरीफ यांना संसदीय पातळीवर पीटीआयचा पाठिंबा मिळेल की नाही, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्याच्या संकटावर मात करण्यासाठी शासन आणि विरोधकांमध्ये सहकार्य अत्यावश्यक आहे. पण याआधीच्या अनेक सुरक्षाविषयक बैठकींमध्ये पीटीआयने बहिष्कार दर्शवला आहे. यामुळेच या वेळेसही ते सहभागी होतील का, याबाबत साशंकता आहे. राष्ट्रपतींच्या विशेष निमंत्रणावर पीटीआय काय भूमिका घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘भारतासोबत मोठे युद्ध होणार नाही, पण…’ पाकिस्तानच्या माजी NSAने का केला असा दावा?

पाकिस्तानमधील स्थिती अत्यंत संवेदनशील

भारताच्या तीव्र प्रतिक्रियेनंतर पाकिस्तानमध्ये सुरू असलेली अस्वस्थता, दहशतीचं वातावरण, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अडचणी पाहता पाकिस्तानसाठी ही बैठक निर्णायक ठरणार आहे. जर यावेळीही देशातील प्रमुख राजकीय पक्ष एकत्र आले नाहीत, तर पाकिस्तानची अंतर्गत एकजूट ढासळू शकते. शाहबाज शरीफ सरकारला पीटीआयचा पाठिंबा मिळतो का, आणि भारताच्या रोषाला उत्तर देण्यासाठी काय रणनीती आखली जाते, यावरच पाकिस्तानच्या आगामी सुरक्षा धोरणाचे भविष्य ठरणार आहे.

Web Title: Pakistans assembly meets urgently amid india tension will pti back shahbaz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 10:32 AM

Topics:  

  • india pakistan war
  • international news
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन
1

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन

इराकमधील नरसंहाराचे काळेकुट्ट पान! अल-खफसा येथे सर्वात मोठ्या एकाच कबरीत दफन 4 हजारांहून अधिक मृतदेह
2

इराकमधील नरसंहाराचे काळेकुट्ट पान! अल-खफसा येथे सर्वात मोठ्या एकाच कबरीत दफन 4 हजारांहून अधिक मृतदेह

Russia Nuclear System : रशियन ‘डेड हँड’ अणु प्रणाली बनू शकते संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा; वाचा काय आहे खासियत?
3

Russia Nuclear System : रशियन ‘डेड हँड’ अणु प्रणाली बनू शकते संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा; वाचा काय आहे खासियत?

भारत रशियाला मोठा धक्का देणार? ‘या’ आवश्यक गोष्टीची खरेदी कमी करण्याची तयारी
4

भारत रशियाला मोठा धक्का देणार? ‘या’ आवश्यक गोष्टीची खरेदी कमी करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.