Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे’; BRICS परिषदेत एस. जयशंकर यांचे वक्तव्य

16 वी BRICS परिषद आज रशियातील कझान येथे पार पाडत आहे. या परिषदेदरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या सन्मानाचा मुद्दा अधोरेखित केला.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 24, 2024 | 04:52 PM
'प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे'; BRICS परिषदेत एस. जयशंकर यांचे वक्तव्य

'प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे'; BRICS परिषदेत एस. जयशंकर यांचे वक्तव्य

Follow Us
Follow Us:

कझान: 16 वी BRICS परिषद आज रशियातील कझान येथे पार पाडत आहे. या परिषदेदरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या सन्मानाचा मुद्दा अधोरेखित केला. याबाबत त्यांनी BRICS म्हटले आहे की, राष्ट्रांसमोर असलेल्या सुरक्षेच्या आव्हानांवर भर दिला पाहिजे तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आवश्यक सुधारणांची गरज देकील त्यांनी अधोरेखित केली.

जागतिक संस्थांमध्ये सुधारणांची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) सारख्या जागतिक संस्थांमध्ये सुधारणांची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही प्रक्रिया कालबाह्य झालेली आहे. भारताने या सुधारणांचा मुद्दा अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर सातत्याने मांडला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अधिक न्याय्य आणि समतोल जागतिक व्यवस्थेची निर्मिती करण्यासाठी प्रस्थापित आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये व्यापक सुधारणांची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

हे देखील वाचा- BRICS परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी घेतली UAE, इजिप्त व उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

जागतिक स्तरावर आर्थिक सुधारणांसाठी BRICS योगदान करू शकते

BRICS देशांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख करताना जयशंकर यांनी जागतिक दक्षिणेसाठी या मंचाने अधिक प्रभावी भूमिका बजावण्याचे आवाहन केले. जयशंकर यांनी म्हटले आहे की, विविध क्षेत्रांमध्ये स्वतंत्र व्यासपीठांचे विस्तार आणि अनावश्यक अवलंबित्व कमी करून जागतिक स्तरावर आर्थिक सुधारणांसाठी BRICS योगदान करू शकते. तसेच, बहुपक्षीय विकास बँकांमध्ये सुधारणांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Represented PM @narendramodi at the BRICS Outreach session in Kazan today. As the old order changes while inequities of the past continues, BRICS is a statement in itself and can make real difference. In this context, highlighted 5 key points: 1️⃣ Strengthening and expanding… pic.twitter.com/t0HhxTvuPe — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 24, 2024


जयशंकर यांनी भारताच्या G-20 अध्यक्षतेचा दाखला देत सुधारणा पुढे नेण्याची प्रक्रिया कशी सुरु झाली याचे उदाहरण दिले. त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेचे लोकशाहीकरण, उत्पादन केंद्रांची निर्मिती, तसेच जागतिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणांची गरज असल्याचे नमूद केले. प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या संपूर्ण आदरासह, हे बदल जगाला अधिक सुरक्षित आणि परस्परसंवादी बनवतील असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या “हे युद्धाचे युग नाही” या वक्तव्याचा पुनरुच्चार

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी जागतिक तणाव आणि संघर्ष दूर करण्याच्या दिशेने प्रयत्नांची गरज देखील स्पष्ट केली. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या “हे युद्धाचे युग नाही” या वक्तव्याचा पुनरुच्चार केला, आणि सांगितले की बहु-ध्रुवीयतेकडे वाटचाल करण्यासाठी सध्याच्या विरोधाभासांचा सामना करण्याची वेळ आली आहे.

हे देखील वाचा- फिलिपाइन्समध्ये टायफून ट्रामीचा कहर; 26 लोकांचा मृत्यू, दीड लाखांहून अधिक लोकांना फटका

Web Title: Territorial integrity and sovereignty must be respected s jaishankars statement at the brics summit nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 04:51 PM

Topics:  

  • narendra modi
  • Russia
  • S. Jaishankar

संबंधित बातम्या

World Largest State: जगातले सर्वात मोठे राज्य कोणते? भारताएवढे क्षेत्रफळ पण लोकसंख्या का एवढी कमी? जाणून घ्या
1

World Largest State: जगातले सर्वात मोठे राज्य कोणते? भारताएवढे क्षेत्रफळ पण लोकसंख्या का एवढी कमी? जाणून घ्या

PM Modi Red Fort Address : ‘कमीत कमी एक भारतीय बँक…’, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, फॉर्च्यून 500 मध्ये भारतातील 50 कंपनी असतील
2

PM Modi Red Fort Address : ‘कमीत कमी एक भारतीय बँक…’, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, फॉर्च्यून 500 मध्ये भारतातील 50 कंपनी असतील

Rahul Gandhi: ‘…RSS ला पाठिंबा देईन, मी त्यांचे रक्षण करेन’, राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण
3

Rahul Gandhi: ‘…RSS ला पाठिंबा देईन, मी त्यांचे रक्षण करेन’, राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

DY Chandrachud Latest News: डी. वाय. चंद्रचूड यांची मोठी आंतरराष्ट्रीय नियुक्ती; रशिया-युक्रेन वादात भूषवणार लवादाची भूमिका
4

DY Chandrachud Latest News: डी. वाय. चंद्रचूड यांची मोठी आंतरराष्ट्रीय नियुक्ती; रशिया-युक्रेन वादात भूषवणार लवादाची भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.