
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. दुसरीकडे, कार्बन उत्सर्जनामुळे वाढणारी प्रदूषणाची समस्या आणि हवामान बदलाचे संकट यामुळे पारंपरिक इंधनांना पर्याय शोधणे काळाची गरज बनले आहे. या दुहेरी आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील भविष्यातील तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी आणि अवगत करण्यासाठी भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय तयारी करत आहे.
मंत्रालयाचे निर्देश
मंत्रालयाने इंडियन ऑईल (IOCL), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) या प्रमुख सरकारी तेल कंपन्यांना त्यांच्या पारंपारिक पेट्रोल पंपांचे रूपांतर ‘मल्टी-फ्युएल मध्ये करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.
पेट्रोल पंपांचे अपडेटिंग
रस्त्यांवर आता केवळ पेट्रोल-डिझेलच्या गाड्या नसून सीएनजी, रस्त्यांवर आता केवळ पेट्रोल-डिझेलच्या गाड्या नसून सीएनजी, इलेक्ट्रिक वाहने आणि भविष्यातील ग्रीन हायड्रोजन वर चालणाऱ्या गाड्याही दाखल होत आहेत. ग्राहकांचा हा बदलता कल ओळखून पेट्रोल पंप स्वतःला वेगाने अपडेट करत आहेत. जुन्या पेट्रोल पंपांच्या जागी आता हाय-टेक एनर्जी स्टेशन्स उभी राहत आहेत, जिथे पारंपरिक इंधनासोबतच हाय-स्पीड ईव्ही चार्जिंग पॉईंट्स आणि कॉम्प्रेस्ड बायो-गॅसचे पंप बसवले जात आहेत. इतकेच नव्हे, तर मंत्रालयाच्या ‘नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन’ अंतर्गत प्रमुख महामार्गांवरील पंपांवर हायड्रोजन रीफ्युएलिंग सिस्टीम उभारण्याचे कामही प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाले आहे.
चिंता मिटली
या मल्टी-फ्युएल स्टेशन्समुळे वाहन चालकांची सर्वात मोठी चिंता दूर होणार आहे, ती म्हणजे ‘रेंज ॲंझायटी’ (Range Anxiety – इंधन किंवा चार्जिंग संपण्याची भीती). अनेक ग्राहक केवळ प्रवासात चार्जिंग स्टेशन किंवा सीएनजी पंप वेळेत मिळेल की नाही, या भीतीने नवीन तंत्रज्ञानाच्या गाड्या घेण्यास कचरतात. परंतु, आता एकाच छताखाली सर्व पर्याय उपलब्ध झाल्यामुळे वाहन चालकांना लांब पल्ल्याच्या प्रवासात कोणताही मानसिक ताण राहणार नाही. तसेच, एकाच कुटुंबातील वेगवेगळ्या इंधनावर चालणारी वाहने एकाच ठिकाणी रिफिल करता येतील.
थोडक्यात काय
पेट्रोलियम मंत्रालयाचे हे पाऊल भारताला हरित ऊर्जेकडे नेणारे आहे. हे बदलते स्वरूप केवळ वाहन चालकांसाठी सोयीचे ठरणार नाही, तर इंधनावरील खर्च कमी करून देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यात आणि शाश्वत वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात गेमचेंजर ठरेल.