
भारतीय सैन्याचे शौर्य आणि पराक्रम जेव्हा सीमेवर किंवा युद्धाच्या मैदानावर दिसून येतो, तेव्हा त्यांना तितकीच भक्कम साथ मिळते ती त्यांच्या ताफ्यातील शक्तिशाली वाहनांची. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत सैन्याच्या गरजा बदलल्या, युद्धतंत्र बदलले आणि त्यानुसार सैन्याच्या ताफ्यातील गाड्यांचा चेहरामोहराही बदलला. स्वदेशी बनावटीच्या या गाड्यांनी दुर्गम भाग, बर्फाच्छादित शिखरे आणि वाळवंटात सैनिकांचे खंबीर साथीदार म्हणून काम केले आहे.
सैन्याच्या ताफ्याचा ऐतिहासिक प्रवास–
हिंदुस्तान ॲम्बेसेडर
स्वातंत्र्योत्तर भारतात लष्करी अधिकारी आणि व्हीआयपींच्या वाहतुकीसाठी ॲम्बेसेडर ही पहिली पसंती होती. तिच्या दणकट बांधणीमुळे आणि आरामदायी प्रवासामुळे या गाडीने अनेक दशके लष्कराच्या ताफ्यात VIP सवारी’ म्हणून राज्य गाजवले.
मारुती जिप्सी
१९८० च्या दशकात सैन्यात दाखल झालेल्या मारुती जिप्सीने हलक्या वजनामुळे आणि ‘४x४’ फोर-व्हिल ड्राईव्ह क्षमतेमुळे सियाचिनसारख्या अत्यंत दुर्गम भागातही कमाल कामगिरी करून दाखवली. लडाखच्या उंच पर्वतांपासून ते राजस्थानच्या वाळवंतापर्यंत जिप्सी सैनिकांची सर्वात विश्वासू सोबती बनली.
महिंद्रा स्कॉर्पिओ अन् आधुनिक वाहने
काळाच्या गरजेनुसार सैन्याला अधिक सुरक्षित आणि ताकदवान वाहनांची गरज भासू लागली. महिंद्रा स्कॉर्पिओ-एन आणि टाटा सफारी स्टॉर्म सारख्या अत्याधुनिक, बुलेटप्रूफ क्षमता असलेल्या स्वदेशी एसयूव्ही आज ताफ्यात तैनात आहेत.
‘इंधनावरील स्वातंत्र्य‘ आणि ग्रीन मोबिलिटीकडे पाऊल
आज केवळ डिझेल किंवा पेट्रोलच्या गाड्यांवर अवलंबून न राहता भारतीय सैन्य ‘इंधनावरील स्वातंत्र्या’कडे वेगाने पावले टाकत आहे.
Independence Day Special: देशभक्तीच्या कथा पाहण्याची Airtel आयपीटीव्हीवर रंगतदार मेजवानी
EV आणि हरित क्रांती:
सीमाभागातील प्रदूषण रोखण्यासाठी आणि इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सैन्याने ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यास सुरुवात केली आहे. सौरऊर्जेवर आधारित चार्जिंग स्टेशन आणि ई-बस-गाड्यांच्या वापरामुळे भारत आता लष्करी वाहतुकीतही ‘आत्मनिर्भर’ आणि पर्यावरणपूरक होत आहे.
स्वातंत्र्यापासून सुरू झालेला हा वाहनांचा प्रवास केवळ वाहतुकीचे साधन नाही, तर तो ‘मेड इन इंडिया’ आणि भारतीय सैन्याच्या अखंड गौरवाचे प्रतीक आहे!