
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
दिल्लीमध्ये जुन्या गाड्यांच्या अशा अनेक बाजारपेठा आहेत, जिथे लक्झरी कार्स आणि सुपरबाईक्स अत्यंत कमी किमतीत उपलब्ध असतात. अशाच एका ठिकाणाचे नाव आहे ‘करोल बाग’ येथील जुन्या गाड्यांची बाजारपेठ आहे. येथे तुम्हाला हव्या तशा तुमच्या बजेट मधल्या कार उच्च दर्जाच्या लक्झरी कार्स अत्यंत परवडणाऱ्या दरात मिळू शकतात.
एका YouTube चॅनेलनुसार, करोल बागच्या जुन्या गाड्यांच्या बाजारात तुम्हाला ‘Mercedes CLA’ ही कार अवघ्या १२ लाख रुपयांना मिळू शकते. याबरोबरच ‘Jaguar F-Pace’ ही कार साधारणपणे २३ लाख रुपयांना खरेदी करता येऊ शकते. तसंच एखादी जुनी ‘Range Rover Evoque’ कार केवळ १८ लाख रुपयांत तुमची होऊ शकते. जर तुम्हाला ‘Ford Endeavour’ खरेदी करण्यात रस असेल, तर तुम्हाला किमान १८ लाख रुपये खर्च करावे लागतील. दरम्यान, या बाजारपेठेत ‘Hyundai Creta’ ही जुनी कार ६.७५ लाख रुपयांना उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला हव्या असलेल्या गाड्या महागड्या खरेदी करायची गरज नाही. इथं तुम्हाला तुमच्या आवडीच्या गाड्या तुमच्या परवडणाऱ्या किंमतीत मिळू शकतील.
करोल बागच्या बाजारपेठेव्यतिरिक्त, दिल्लीमध्ये जुन्या गाड्यांची खरेदी-विक्री होणारी इतर प्रमुख ठिकाणंही आहेत. सरोजिनी नगर, लाजपत नगर, विकास पुरी आणि मोती नगर यांसारख्या जागांवरही तुम्हाला बरेच चांगले चांगले पर्याय मिळू शकतील. जर तुम्ही एखादी जुनी कार खरेदी करण्याचे नियोजन करत असाल, तर काही विशिष्ट बाबींबाबत सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचं आहे. कारण पूर्ण माहिती नसल्यास त्याचा परिणाम म्हणजे तुमची फसवणुक होऊ शकते त्यामुळे या गोष्टींना बळी पडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी, तुम्हाला काही आवश्यक तपशीलांची सखोल माहिती असणे गरजेचे आहे.
जुन्या वाहनाची खरेदी करताना, काही महत्त्वाच्या घटकांकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. यातील सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे वाहनाच्या कागदपत्रांची सखोल पडताळणी करणं. ‘नोंदणी प्रमाणपत्राच्या’ हस्तांतरणाची प्रक्रिया सुरळीत आणि नियमानुसार असल्याची खात्री करणं गरजेचं आहे त्यासोबतच वाहनाची प्रत्यक्ष स्थिती कशी आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. सुस्थितीत असल्याची तुम्ही पडताळणी केली पाहिजे. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे; कारण अनेकदा फसवणूक किंवा अनियमिततांना सामोरे जाण्याचा धोका येथे संभवतो. जर तुम्हाला कमी किमतीत एखादे चांगले वाहन खरेदी करायचे असेल, तर खरेदी करण्यापूर्वी संपूर्ण माहिती मिळवणे आणि सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे; जेणेकरून भविष्यात तुम्हाला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.