Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Life Insurance News: भारतीय कुटुंबांचा ‘आर्थिक कणा’ ठरतोय जीवन विमा; एका वर्षात 6.30 लाख कोटी रुपयांचे लाभ वितरित!

आयआरडीएआयच्‍या 2024-25 च्या नवीन वार्षिक अहवालानुसार, जीवन विमा कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2025 मध्ये एकूण 6.30 लाख कोटी रुपयांचे लाभ दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 24, 2026 | 09:28 PM
भारतीय कुटुंबांचा 'आर्थिक कणा' ठरतोय जीवन विमा (Photo Credit- X)

भारतीय कुटुंबांचा 'आर्थिक कणा' ठरतोय जीवन विमा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • भारतीय कुटुंबांचा ‘आर्थिक कणा’ ठरतोय जीवन विमा
  • एका वर्षात 6.30 लाख कोटी रुपयांचे लाभ वितरित!
मुंबई, २३ मार्च २०२६: भारतातील जीवन विमा क्षेत्र कुटुंबांचे संरक्षण आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनामध्ये सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आयआरडीएआयच्‍या 2024-25 च्या नवीन वार्षिक अहवालानुसार, जीवन विमा कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2025 मध्ये एकूण 6.30 लाख कोटी रुपयांचे लाभ दिले आहेत. या आकडेवारीमधून जीवन विमा उद्योग भारतातील कुटुंबांना संरक्षणापासून निवृत्तीपर्यंत आणि संपत्ती निर्मितीपर्यंत त्यांच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर देत असलेला आर्थिक आधाराचा स्‍तर दिसून येतो.

”पर्सिस्टन्सी म्‍हणजेच विमा सुरू ठेवण्याचे प्रमाण, लाभांचे वाटप आणि आर्थिक सक्षमता यांसारख्‍या महत्त्वाच्‍या आकडेवारीमधून स्‍पष्ट होते की, भारतातील जीवन विमा क्षेत्र कुटुंबांसाठी संपत्तीच्या साठ्यासारखे आहे, जे रोख उपलब्धता आणि दीर्घकालीन स्थिरता या दोन्ही गोष्टी प्रदान करते. विशेष म्हणजे, विम्याद्वारे देण्यात आलेल्या लाभांपैकी 92 टक्‍के लाभ हे हयात असताना मिळणारे लाभ म्हणून देण्यात आले आहेत. यामधून निदर्शनास येते की, हा उद्योग संरक्षण देण्‍यासोबत दीर्घकालीन आर्थिक भागीदार आहे, जो कुटुंबांच्‍या आर्थिक सातत्‍याची खात्री देतो. आमच्या मोहिमांच्या माध्यमातून आम्ही व्‍यक्तींना जीवन विम्याच्या क्षमतेबद्दल जागरूक करत राहू, ज्‍यामुळे ते आपल्या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण करू शकतील आणि विश्वासार्ह आर्थिक साठा निर्माण करू शकतील,” असे भारतातील जीवन विमा कंपन्यांच्या व्यवसाय तत्त्‍वाचे स्पष्टीकरण देताना इन्‍शुरन्‍स अवेअरनेस कमिटी (आयएसी-लाइफ)चे अध्‍यक्ष कमलेश राव म्‍हणाले.

एकूण वितरित लाभांपैकी 2.33 लाख कोटी रूपये पॉलिसीमधून पैसे काढणे आणि सरेंडर यामुळे देण्यात आले आहेत, ज्‍यामध्‍ये गेल्‍या वर्षाच्या तुलनेत 1.77 टक्‍केक वाढ झाली. विम्याचे पर्सिस्टन्सी रेशो प्रबळ असल्याने हे पैसे काढणे म्हणजे नियोजित एक्झिट असल्याचे दिसून येते. पॉलिसीधारक आपल्या कुटुंबाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी या निधीचा वापर करत आहेत, जसे मुलांचे उच्‍च शिक्षण, स्वतःचे घर खरेदी करणे किंवा परदेशात सुट्टीचा आनंद घेणे इत्यादी. जीवन विम्याकडे नेहमी आर्थिक संरक्षणाचे उत्तम साधन म्हणून पाहिले जाते, पण आता लाभार्थी या पैशांचा वापर इतर महत्त्वाच्या कामांसाठी देखील करत आहेत. मुलांसाठीचे प्लॅन्स, अॅन्युइटी पॉलिसी, आणि बाजारपेठेशी संबंधित लाभ यांसारख्या वैविध्यपूर्ण विमा उत्पादनांमुळे ग्राहक आता त्यांच्या पॉलिसीचे पैसे पुन्हा नवीन पॉलिसींमध्ये गुंतवून आपली जीवन उद्दिष्टे साध्य करू शकतात.

महानगर गॅस लिमिटेडने दिले अखंडित PNG आणि CNG पुरवठ्याचे आश्वासन; सादर केले ग्राहकाभिमुख पीएनजी उपक्रम आणि लाभ

विम्यापोटी दिले जाणारे लाभ हे निव्वळ प्रीमियम उत्पन्‍नाच्या 71.92 टक्‍के असूनही आर्थिक सक्षमता गुणोत्तर नियामक मर्यादेच्या वर कायम आहे. आयआरडीएआयच्या 2024-25 च्या वार्षिक अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, 31 मार्च 2025 पर्यंत सर्व जीवन विमा कंपन्यांनी 1.50 च्या किमान विहित सॉल्व्हन्सी रेशोचे (नियंत्रण पातळी) पालन केले आहे. विमा कंपन्यांनी मालमत्ता-देयता जुळवणी, पुराणमतवादी मृत्युदर गृहितके आणि आयआरडीएआयने अनिवार्य केलेल्या मजबूत सॉल्व्हन्सी मार्जिनच्या माध्यमातून हे व्यवस्थापन केले आहे. जवळपास 100 टक्‍के क्लेम सेटलमेंट रेशोसह या आकडेवारीमधून उद्योगाची विश्वासार्हता आणि सातत्यपूर्ण लाभ देण्याची क्षमता निदर्शनास येते.

अस्थिर भू-राजकीय वातावरणासह अनेक घटक भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाकांक्षेची वारंवार चाचणी घेतील. अशा परिस्थितीत अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी देशातील नागरिकांना आर्थिक संरक्षणाची गरज आहे. निश्चितच, भारतातील जीवन विमा उद्योगाकडे देशाच्या आकांक्षांना पाठबळ देणारी आर्थिक सुदृढता आणि ताकद आहे. हा उद्योग आवश्यक आर्थिक सुरक्षा कवच प्रदान करून देशाची स्थिरता वाढवण्यासाठी आणि कुटुंबांची आर्थिक उद्दिष्टे व स्वप्‍ने पूर्ण करण्यासाठी योगदान देत आहे.

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम केले लागू

Web Title: Life insurance benefits india 6 30 lakh crore distributed fy25

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 09:28 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री? विमान प्रवास आणखी महागण्याची शक्यता; ICRA ने दिला धोक्याचा इशारा
1

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री? विमान प्रवास आणखी महागण्याची शक्यता; ICRA ने दिला धोक्याचा इशारा

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार
2

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार

Elon Musk यांच्यानंतर ‘हा’ भारतीय व्यक्ती जगातील सर्वात महागडा CEO! दररोज कमवतो तब्बल 21 कोटी रुपये
3

Elon Musk यांच्यानंतर ‘हा’ भारतीय व्यक्ती जगातील सर्वात महागडा CEO! दररोज कमवतो तब्बल 21 कोटी रुपये

Market Crash: फक्त ‘या’ दोघांनी नोकरी बदलली अन् जगभरातील शेअर बाजार पत्त्यांसारखे कोसळले; टेक कंपन्यांचे अब्जावधी डॉलर्स पाण्यात
4

Market Crash: फक्त ‘या’ दोघांनी नोकरी बदलली अन् जगभरातील शेअर बाजार पत्त्यांसारखे कोसळले; टेक कंपन्यांचे अब्जावधी डॉलर्स पाण्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.