
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टी कराव्या लागणार (फोटो सौजन्य - iStock)
UP सरकारने मे महिन्यात माहिती दिली होती की ज्या शेतकऱ्यांकडे वैध शेतकरी ओळखपत्र आहे त्यांनाच खते उपलब्ध होतील आणि जमिनीच्या नोंदीही तपासल्या जातील. शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून खतांचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात सरकारने हा निर्णय घेतला आहे. शेतकरी ओळखपत्र बनवणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.