
Enterprise AI Investment India ( सौजन्य - सोशल मीडिया )
गुंतवणुकीचा हा वेग देशाच्या वास्तविक सामर्थ्यावर उभारला जात आहे: जागतिक दर्जाच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, सखोल अभियांत्रिकी कौशल्ये आणि जागतिक स्तरावर सर्वात वेगाने एआय स्वीकारणाऱ्यांपैकी एक असलेला भारत. पण, पुढील टप्पा कंपन्या किती वेगाने एआय लागू करतात यापेक्षा किती आत्मविश्वासाने त्याचे नियंत्रण करू शकतात यावर अवलंबून असेल. आजघडीला, भारतातील केवळ २२ टक्के उद्योगांकडे एआय चाचणी, ऑडिटिंग आणि जोखीम-मूल्यांकन प्रक्रिया उपलब्ध आहेत. हे अंतर आधीच स्पष्टपणे दिसून येत आहे:
भारतातील ५४ टक्के कंपन्या एआय एजंट्स लागू करत आहेत, पण केवळ ११ टक्के कंपन्या स्वायत्त वर्कफ्लोकडे वळल्या आहेत. यावरून दिसून येते की, भारत वेगाने पुढे जात आहे, पण एआयला कुठे स्वतंत्रपणे काम करू दिले पाहिजे याबद्दल स्पष्ट खबरदारी घेतली जात आहे. अंमलबजावणी आणि स्वायत्तता यांतील हे अंतर भारतातील व्यावसायिक प्रमुख प्राधान्य देत असलेल्या विश्वास, जोखीम आणि तयारीच्या विचारांना दर्शवते:
६० टक्के कंपन्या पारदर्शकता आणि चुकीच्या माहितीच्या संभाव्य धोक्याला मुख्य विचार मानतात.
५५ टक्के कंपन्या नियामक आणि अनुपालनाला दर्शवतात.
५० टक्के कंपन्या डेटा गोपनीयता आणि सुरक्षेच्या चिंतांना कारणीभूत मानतात.
एंटरप्राइजद्वारे तैनात केलेला प्रत्येक एआय एजंट डेटा, सिस्टम आणि निर्णयांपर्यंत पोहोचणारी एक स्वतंत्र ओळख असते. या एजंट्सना चालवण्यासाठी आवश्यक प्रशासन तयार करणे, यावरून भारतातील उद्योग महत्त्वाचे काम एआयवर किती वेगाने सोपवू शकतात हे ठरेल.
“भारताने सिद्ध केले आहे की, ते फार कमी बाजारपेठा करू शकतील अशा मोठ्या प्रमाणावर एआयसाठी कटिबद्ध राहू शकतात. पुढील मोठी झेप भारतातील उद्योग त्यांच्या या महत्त्वाकांक्षेची सांगड प्रशासन, कनेक्टेड डेटा आणि वर्कफ्लोशी कशी घालतात यावरून ठरेल, ज्यामुळे एआय अधिक महत्त्वाची कामे हाती घेऊ शकेल. ज्या कंपन्या या पायाभूत सुविधा प्रथम तयार करतील, त्या भारतासाठी एआयच्या मूल्याचा पुढील टप्पा समोर आणतील,” असे सर्व्हिसनाऊ इंडिया आणि सार्कचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि ग्रुप व्हाईस प्रेसिडेंट कुलमीत बावा म्हणाले.
भारतातील उद्योग क्षेत्राच्या वेगाला एआयबाबत तितक्याच उद्दिष्टपूर्ण राष्ट्रीय दृष्टिकोनाची जोड मिळत आहे. देशाने एक सक्षम चौकट तयार करण्यासाठी लवकर पावले उचलली आहेत. यामध्ये २०२५ मध्ये लागू झालेल्या डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अॅक्ट आणि डीपीडीपी नियमावलीपासून ते फेब्रुवारी २०२६ च्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये सादर केलेल्या एआय गव्हर्नन्स मार्गदर्शक तत्त्वांपर्यंत इंडिया-एआय मिशन आणि इंडिया-एआय सेफ्टी इन्स्टिट्यूटच्या स्थापनेचा समावेश आहे. हा दृष्टिकोन नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासोबत उपक्रम, टॅलेंट आणि ग्राहक यांच्यात विश्वास निर्माण करतो. उद्योगांसाठी त्यांचे अंतर्गत एआय प्रशासन या राष्ट्रीय दिशेशी सुसंगत करणे हे वेगाने त्यांच्या सज्जतेला दर्शवत आहे आणि लवकर पावले उचलणाऱ्यांसाठी एक मोठा फायदा ठरत आहे.
एआयचा सध्या भारताच्या सरासरी आयटी बजेटमध्ये १६.६ टक्के हिस्सा आहे, जो २०२७ पर्यंत २१.३ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. यामधून स्पष्ट हेतू दिसून येतो. या हेतूला नियंत्रित आणि विश्वासार्ह एआयमध्ये रूपांतरित करणे हे त्याच्या खाली असलेल्या पायाभूत स्तरावर अवलंबून आहे: आज भारतातील केवळ १८ टक्के कंपन्यांनी विखुरलेल्या जुन्या यंत्रणा बदलून एकात्मिक प्लॅटफॉर्म वापरण्यास सुरुवात केली आहे, आणि या संशोधनामध्ये एआय-सक्षम वर्कफ्लोला १०० पैकी ४१ गुण मिळाले आहेत. कनेक्टेड वर्कफ्लोशिवाय एआयवर लक्ष ठेवण्यासाठी, ऑडिट करण्यासाठी किंवा नियंत्रण ठेवण्यासाठी कोणताही एकमेव स्तर उपलब्ध राहत नाही.
भारतातील उद्योग, जे पायाभूत सुविधा प्रबळ करण्यासाठी प्रयत्न करत आहेत:
• ७४ टक्के कंपन्यांच्या मते, एआयसाठी डेटा अचूकता, प्रवेश आणि व्यवस्थापन हा भाग सर्वाधिक प्रबळ करण्याची गरज आहे.
• ५६ टक्के कंपन्या जुन्या यंत्रणांच्या एकात्मीकरणाला दर्शवतात.
आव्हान भारताच्या संपूर्ण उद्योग क्षेत्रामध्ये दिसून येत आहे, मग ते वेगाने विकासासाठी एआयचा विस्तार करणारे डिजिटल-नेटिव्ह व्यवसाय असो, किंवा गुंतागुंतीच्या आणि विखुरलेल्या कामकाजाचे डिजिटायझेशन करणारे स्थापित उद्योग असो. दोन्ही क्षेत्रे एकच ऑपरेटिंग स्तर तयार करत आहेत आणि हे योग्यरित्या पूर्ण झाल्यास दोघांनाही फायदा होणार आहे. या त्रुटी भरून काढल्याने भारताचा एकूण एआय गव्हर्नन्स स्कोअर, जो सध्या १०० पैकी ५५ आहे, जगातील आघाडीच्या एआय देशांच्या श्रेणीत पोहोचेल.
या संशोधनाबाबत आपले मत व्यक्त करत डेलॉईट इंडियाचे पार्टनर, चीफ स्ट्रॅटेजी अँड इनोव्हेशन ऑफिसर अश्विन वेल्लोडी म्हणाले, “भारतात एआयची परिपक्वता नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. कंपन्या ज्याप्रमाणे संपूर्ण उद्योगात एआयचा विस्तार करत आहेत, त्याप्रमाणे ही संधी केवळ वैयक्तिक वापरापुरती मर्यादित न राहता वर्कफ्लो, निर्णय प्रक्रिया आणि कार्यप्रणालीची पुनर्रचना करण्याकडे सरकत आहे. यासाठी डेटा, कौशल्य, शासन आणि जबाबदारी यांसारख्या एआयला अधिक विस्तारक्षम आणि विश्वासार्ह बनवणाऱ्या पायाभूत घटकांवर समान लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
एजेंटिक एआय या बदलाला लक्षणीय गती देईल, कारण एआय अधिक गुंतागुंतीची कामे हाती घेण्यास आणि अधिक स्वायत्ततेने काम करण्यास सुरुवात करत आहे. एआयने कुठे कार्य केले पाहिजे, मानवी निर्णयक्षमता कुठे सर्वाधिक मूल्य जोडते आणि हे दोन्ही एकत्र कसे काम करतात याविषयी जे निर्णयपूर्वक पर्याय निवडतील, त्या कंपन्या शाश्वत मूल्य निर्माण करतील. शेवटी, एआयची परिपक्वता एखादी कंपनी किती वेगळ्या प्रकारे काम करते, निर्णय घेते आणि मूल्य निर्माण करते यावरून दिसून येईल.
परतावा प्रत्यक्ष दिसत आहे – आणि भारतामध्ये व एपीएससीमधील एआय पेससेटर्समध्ये २३ गुणांचे अंतर आहे
हा परतावा आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. कनेक्टेड यंत्रणा, विश्वासार्ह डेटा, प्रबळ प्रशासन आणि संपूर्ण उद्योगात एकात्मिक वर्कफ्लो तयार करणाऱ्या एपीएसीमधील एआय लीडर्सना (पेससेटर्स) आज एआय गुंतवणुकीवर १४९ टक्के परतावा (आरओआय) मिळत आहे, जो पुढील दोन वर्षांत १८१ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. हे लीडर्स आपल्या सहकाऱ्यांपेक्षा सहा पटीने अधिक उत्पादक आहेत आणि एआय गव्हर्नन्सच्या बाबतीत त्यांनी १०० पैकी ७८ गुण मिळवले आहेत, तर भारताचा स्कोअर १०० पैकी ५५ आहे.
“भारत आणि जगातील एआय लीडर्स यांच्यातील २३ गुणांचे हे अंतर मागे पडल्याची गोष्ट नाही, तर एक महत्त्वाची सूचना आहे. प्रशासनाचा स्तर आत्ताच तयार करा, तुमचा डेटा कनेक्ट करा आणि व्यवसायाला खरोखर पुढे नेणारी कामे एआयला करू द्या. पुढील १२ महिन्यांत जे उद्योग यावर अंमलबजावणी करतील, तेच भारताच्या एआय दशकाची दिशा ठरवतील.” – कुलमीत बावा म्हणाले.
सर्व्हिसनाऊ एंटरप्राइज एआय मॅच्युरिटी इंडेक्स २०२६ चे पूर्ण निष्कर्ष आणि भारतातील उद्योग त्यांचा एआय पाया कसा दृढ करत आहेत हे जाणून घेण्यासाठी ServiceNow Enterprise AI Maturity Index 2026 येथे भेट द्या.