Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षाअंतर्गत करार कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र! आंदोलकांची आक्रमक भूमिका; शैक्षणिक कामकाजावर प्रक्रिया ठप्प

मुंबईतील आझाद मैदानावर समग्र शिक्षाअंतर्गत करार कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. ९ मार्चपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे अनेक कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 26, 2026 | 03:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

मुंबईतील आझाद मैदानावर समग्र शिक्षाअंतर्गत कार्यरत करार कर्मचाऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. ९ मार्चपासून सुरू असलेल्या या बेमुदत आंदोलनाने आता गंभीर वळण घेतले असून, अन्नत्याग आमरण उपोषणामुळे परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून हजारो कर्मचारी आपल्या कुटुंबापासून दूर राहून या आंदोलनात सहभागी झाले आहेत. शासनाच्या विलंबाच्या भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी अधिक आक्रमक भूमिका स्वीकारली आहे.

Nashik News : मयुरेश आढावची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी; ‘पिकासो आर्ट कॉन्टेस्ट’मध्ये पटकावला ‘स्टार आर्टिस्ट’ बहुमान!

या आंदोलनाचा सर्वात गंभीर पैलू म्हणजे उपोषण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची खालावत चाललेली प्रकृती. अन्नत्यागामुळे दररोज काही कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागत असून, त्यांची तब्येत चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. तरीही शासनाकडून या परिस्थितीकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीही आंदोलनकर्त्यांनी आझाद मैदानावरच गुढी उभारून शासनाला प्रतीकात्मक इशारा दिला. “आश्वासन नको, कायम करा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि आंदोलनाचा सूर अधिक तीव्र झाला.

या आंदोलनाला विविध शिक्षक संघटना आणि काही लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळत असला, तरी प्रत्यक्षात शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. “पाठिंबा नको, आदेश द्या” अशी थेट आणि स्पष्ट भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. त्यांच्या मते, केवळ आश्वासनांवर वेळ घालवण्यापेक्षा शासनाने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. आंदोलनकर्त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या आंदोलनाचा परिणाम केवळ कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नसून, राज्यातील शैक्षणिक कामकाजावरही मोठा परिणाम होत आहे. संच मान्यता प्रक्रिया, आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया, शाळांना दिले जाणारे अनुदान वितरण, तसेच शिक्षक प्रशिक्षण यांसारखी अनेक महत्त्वाची कामे ठप्प झाली आहेत. यामुळे शैक्षणिक व्यवस्थेवर परिणाम होत असून, विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. दीर्घकाळ हे आंदोलन सुरू राहिल्यास शिक्षण क्षेत्रावर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.

यापूर्वीही या मुद्द्यावर आंदोलन झाले होते. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री यांनी समिती गठीत करून तिच्या अहवालाच्या आधारे कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार २५ डिसेंबर २०२५ रोजी समितीने सकारात्मक अहवाल सादर केला होता. हिवाळी अधिवेशनातही हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत ना कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला आहे, ना संबंधित शासन आदेश (जीआर) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा संताप शिगेला पोहोचला असून, शासनावरील विश्वासही डळमळीत झाल्याचे दिसून येत आहे.

अल्पवयीन मुलांच्या Social Media वापराबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! शाळांमध्ये आता ‘डिजिटल सेफ्टी’चे धडे?

आंदोलनकर्त्यांनी आपल्या प्रमुख मागण्या स्पष्टपणे मांडल्या आहेत. समग्र शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व ३,३७८ करार कर्मचाऱ्यांना तत्काळ शासन सेवेत सामावून घेण्यात यावे, समितीच्या अहवालावर तातडीने निर्णय जाहीर करण्यात यावा, समायोजनासंदर्भातील शासन निर्णय त्वरित निर्गमित करण्यात यावा, तसेच सेवाशर्ती आणि वेतनाबाबत स्पष्टता देण्यात यावी, या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

एकूणच, समग्र शिक्षाअंतर्गत करार कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. शासनाने वेळ न दवडता सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे केवळ कर्मचाऱ्यांचेच नव्हे, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचेही मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या प्रश्नावर तातडीने तोडगा काढणे अत्यंत आवश्यक बनले आहे.

Web Title: Agitation by contract employees intensifies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Career News
  • education news

संबंधित बातम्या

How to Become An Air Hostess: एअर होस्टेस बनायचंय? डिग्रीपासून ट्रेनिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण मार्ग
1

How to Become An Air Hostess: एअर होस्टेस बनायचंय? डिग्रीपासून ट्रेनिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण मार्ग

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा; विधी प्रवेशातील मान्यतेच्या प्रश्नावर अभाविपचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
2

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा; विधी प्रवेशातील मान्यतेच्या प्रश्नावर अभाविपचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

JPSC-JSSC वादाचा भडका! विद्यार्थी संतप्त का झाले? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3

JPSC-JSSC वादाचा भडका! विद्यार्थी संतप्त का झाले? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अकोला जिल्ह्यात 15 एक शिक्षकी शाळा; 42 शिक्षक अतिरिक्त, समायोजनाची अद्यापही प्रतीक्षाच
4

अकोला जिल्ह्यात 15 एक शिक्षकी शाळा; 42 शिक्षक अतिरिक्त, समायोजनाची अद्यापही प्रतीक्षाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.