मुंबई विद्यापीठ यांनी शून्य विद्यार्थी नोंदणी आणि कालबाह्य अभ्यासक्रमांमुळे ३०४ परीक्षा निष्क्रिय घोषित केल्या आहेत. मागील दोन ते तीन वर्षांत एकाही विद्यार्थ्याने नोंदणी न केलेल्या १२५ परीक्षा बंद करण्यात आल्या.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी २०२६-२७ साठी शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. पदव्युत्तर, पदविका आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी एकूण ४० विद्यार्थ्यांची निवड होणार आहे.
वाशिम जिल्हा पोलिस दलातील रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया बुधवार (दि. ११) पासून सुरू होत असून, ती चिखली मार्गावरील नवीन पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पारदर्शकपणे राबवली जाणार आहे.
आजच्या काळात तरुण पारंपरिक करिअरच्या चौकटीबाहेर जाऊन नव्या क्षेत्रांकडे वळत आहेत. एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंटमध्ये विमानसेवा क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या सांभाळण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
प्रवेश परीक्षेनंतर समुपदेशनात मिळालेल्या रैंकनुसार संस्थांमधील विद्यार्थ्यांना जागा वाटप केल्या जातात. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संबंधित संस्थेत पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून प्रवेश घ्यावा लागेल.
परीक्षा म्हणजे आयुष्याच्या सुंदर प्रवासाची सुरुवात असून, कोणतेही दडपण न घेता उत्सवाच्या भावनेने परीक्षा द्यावी, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले.
आजच्या डिजिटल युगात संगीत हे केवळ छंद न राहता करिअरचा मजबूत पर्याय बनले आहे. Music Producer हा गाण्याच्या निर्मिती प्रक्रियेचा केंद्रबिंदू असून संकल्पनेपासून अंतिम आउटपुटपर्यंत तो जबाबदारी सांभाळतो.
बँकिंग क्षेत्रात ज्यांना आपले भविष्य घडवायचे आहे, ही बातमी त्यांच्यासाठी आहे. त्या युवकांसाठी युवतींसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेत काम करण्याचे तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बारावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी प्रशासन सज्ज. टोकन पद्धतीने तपासणी, ड्रोन कॅमेरे आणि सीसीटीव्ही वॉच राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार.
छत्रपती संभाजीनगर येथे ११ फेब्रुवारीला २५३३ पदांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित केला आहे. टोयोटा, इंडूरन्स, कल्याण ज्वेलर्स यांसारख्या ३७ कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी आहे.
नासाच्या आर्टेमिस २ मोहिमेत अहिल्यानगरमधील डोंगरगण जिल्हा परिषद शाळेचा सहभाग! ३९ विद्यार्थी आणि २ शिक्षकांची नावे एसडी कार्डद्वारे चंद्रावर पाठवली जाणार असून नासाने त्यांना बोर्डिंग पासही दिले आहेत.
कसारा केंद्रांतर्गत ३६ जिल्हा परिषद शाळा व ४ खाजगी शाळा कार्यरत आहेत. एवढ्या मोठ्या शैक्षणिक केंद्र शाळेतच मूलभूत सुविधा दुरवस्थेत असल्याने पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
परीक्षेची तारीख जाहीर झाल्यावर तरूणांनी आपली तयारी जोरदारपणे सुरू केली आहे. ही परीक्षा तीन दिवसांमध्ये सहा शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. यामुळे सर्व उमेदवारांना परीक्षा देण्यास सोपे जाईल.
UPSC ने नागरी सेवा परीक्षा २०२६ साठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. आता कार्यरत IAS/IFS अधिकाऱ्यांना परीक्षा देता येणार नाही, तर परीक्षेच्या सुरक्षेसाठी AI आणि आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य केले आहे.