
CBSC
बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी गुणांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच परीक्षेच्या उत्तरपत्रिका हजारो शिक्षक तपासत असल्याने गुणांमध्ये असमतोल दिसून येऊ शकतो. त्यामुळे हा असमतोल टाळण्यासाठी विद्यार्थ्यांचे गुण संतुलित केले जातात. काही प्रकरणांमध्ये, जर प्रश्नपत्रिकेत एखादा प्रश्न चुकीचा किंवा गोंधळात टाकणारा असेल तर विद्यार्थ्यांना त्याचे अतिरिक्त गुण दिले जातात.
पूर्वी प्रश्न थेट पुस्तकातील स्वाध्यायावर आधारित असायचे त्यामुळे पाठांतर करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळायचे तसेच काही विद्यार्थ्यांचे उत्तर थोडे जरी चुकले तरी पूर्ण गुण कापले जात होते. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत (NEP 2020) ५०% – २०% – ३०% हे सूत्र वापरले जात आहे. यामध्ये ५०% प्रश्न क्षमतेवर आधरित (Competency based) , २०% प्रश्न बहुपर्यायी (MCQs) तर ३०% प्रश्न केस स्टडीवर (case study) आधारित असतात. तसेच आता उत्तरासोबत लिहिण्याची पद्धत आणि त्याच्या सादरीकरणाला अधिक महत्त्व दिले जाते तसेच २० ते ३० गुण हे अंतर्गत मूल्यमापनाला(Internal Assessment) दिले जातात. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे एकुण गुण वाढतात.
Education News: राज्यातील ७३६ शिक्षण संस्थांना सरकारी अनुदानाची दारे बंद; राज्य सरकारचा मोठा दणका
यंदाचा १० वीचा निकाल ९३.७०% लागला असून २.२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत तसेच गणितासारख्या विषयात ११,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. एकंदरीत आधुनिक तंत्रज्ञान डिजिटल मूल्यांकन आणि विद्यार्थीं केंद्रित मार्किंग सिस्टीममुळे आता बोर्डाच्या परीक्षेत पैकीच्यापैकी गुण मिळवणे शक्य झाले आहे.