Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये बालभवनसारखी केंद्रे उभारण्याचा प्रयत्न; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बालभवनसारखी केंद्रे उभारण्याचा प्रयत्न केला जाईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 24, 2025 | 05:01 PM
राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये बालभवनसारखी केंद्रे उभारण्याचा प्रयत्न; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव
Follow Us
Close
Follow Us:

शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जवाहर बालभवन महत्त्वाची भूमिका बजावत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारची केंद्रे उभारण्याचा प्रयत्न केला जाईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.

मुंबईतील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनचा 73 वा वर्धापन दिन सोमवारी साजरा झाला. या कार्यक्रमाला राज्यमंत्री डॉ. भोयर उपस्थित होते. त्यांच्यासह बालभवनचे अशासकीय सदस्य प्रशांत भामरे, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, जवाहर बालभवनच्या संचालक नीता पाटील, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आणि विद्यार्थी उपस्थित होते.

आसाम रायफल्सच्या ‘या’ भरतीसाठी करा अर्ज; जाणून घ्या पात्रता निकष

राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मित असणे हा शालेय शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. यासाठी शिक्षण आनंददायी असण्यावर राज्य शासनाचा भर आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास व्हावा या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. 73 वर्षांपूर्वी स्थापन झालेले जवाहर बालभवन हेच कार्य अतिशय उत्तमरितीने पार पाडीत असून विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, खेळ, विविध छंद यामध्ये मिळविलेले नैपुण्य पाहता आणि याद्वारे त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे स्मित पाहता ही इमारत उभारण्यामागील उद्देश सफल झाल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच आपली आवड जोपासता यावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बालभवनसारखे केंद्र उभारण्याचा आपला प्रयत्न राहील, असे ते म्हणाले.

यावेळी राज्यमंत्री डॉ. भोयर यांच्या हस्ते बालभवनच्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम, बालगीत, आदिवासी कोरकू नृत्य आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या या सादरीकरणामुळे बालभवनमध्ये घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा ठसा उमटला.

बालभवनच्या संचालक नीता पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये बालभवन स्थापनेचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, “आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे” या ब्रीदवाक्याने प्रेरित होत जवाहर बालभवन गेली ७३ वर्षे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना केवळ शालेय शिक्षणापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या अंगभूत कलागुणांना विकसित करण्यासाठी विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवले जातात. वर्षभर घेण्यात येणाऱ्या छंद शिबिरांमधून, गायन-नृत्य प्रशिक्षणातून आणि विविध कार्यशाळांमधून विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी धार प्राप्त होते.

Mumbai University : विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी! आता एकाच वेळी मिळवा दोन पदव्या, कसं ते जाणून घ्या…

राज्यभरातील विद्यार्थ्यांना अशा सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व जिल्ह्यांत बालभवनसारखी केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थी शालेय शिक्षणासोबतच त्यांच्या कलागुणांना वाव देऊ शकतील आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास डॉ. भोयर यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढून त्यांना शिक्षणासोबतच त्यांच्या कलेमध्ये प्रावीण्य मिळवण्याची संधी उपलब्ध होईल.

Web Title: Efforts are being made to set up bal bhavan like centers in all districts of the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 05:01 PM

Topics:  

  • Career News
  • Educational News

संबंधित बातम्या

परीक्षेशिवाय IT व्यक्तींची SBI मध्ये भरती, रू. 1.05 लाखापर्यंत मिळणार पगार; अर्जाची शेवटची तारीख जवळ
1

परीक्षेशिवाय IT व्यक्तींची SBI मध्ये भरती, रू. 1.05 लाखापर्यंत मिळणार पगार; अर्जाची शेवटची तारीख जवळ

महापुराचा फटका! सीईटी सेलने वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेची वाढवली मुदत
2

महापुराचा फटका! सीईटी सेलने वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेची वाढवली मुदत

Abhishek Sharma चा गुरू Yuvraj Singh कडून बॅटिंग टिप्स, शिकण्यासाठी कुठे करता येईल अर्ज
3

Abhishek Sharma चा गुरू Yuvraj Singh कडून बॅटिंग टिप्स, शिकण्यासाठी कुठे करता येईल अर्ज

IB Security Assistant (Motor Transport) Recruitment 2025 : गुप्तचर खात्यात ४५५ पदांची भरती जाहीर
4

IB Security Assistant (Motor Transport) Recruitment 2025 : गुप्तचर खात्यात ४५५ पदांची भरती जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.