
blo
मुंबई शहर जिल्हा निवडणुक अधिकारी आणि महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी याबाबत यंत्रणांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या या कार्यक्रमाअतंर्गत विविध शासकिय विभागातील पात्र ‘क’ कर्मचाऱ्यांची ‘बीएलओ’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्तीचे निर्देश देऊनही अनेक कर्मचारी आणि शिक्षक अद्यापही नेमून दिलेल्या विधानसभा मतदारसंघ कार्यालयामध्ये रुजू न झाल्याने त्यांना वारंवार दुरध्वनी आणि संदेशांच्या माध्यामातून वारंवार संपर्क साधला. मात्र, काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने आता कठोर भूमिका घेतली आहे. नियुक्त बीेएलओ संबंधित कार्यालायत हजर न झाल्यास नोंदणी अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. अशा कर्मचाऱ्याविरोधात पोलिसांना कडक कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.
या आदेशाविरोधात शैक्षणिक संस्थाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सध्या नवीन शाैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून अनेक शिक्षक जनगणनेसह अन्य शासकीय कामांमध्ये गुंतलेले आहेत. अशा परिस्थितीत अतिरिक्त निवडणूक कामांची जबाबादारी पार पाडणे अवघड जात असल्याने काही प्राचार्यांनी सांगितले आहे.