Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महत्वाची बातमी! पाचवी तसेच आठवी शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण ३१,७८६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. पात्र विद्यार्थ्यांना पुढील २ ते ३ वर्षांसाठी आर्थिक मदत मिळणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 10, 2025 | 06:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर झाला असून, यामध्ये राज्यातील ३१ हजार ७८६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल ९ लाख ४४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, ज्यापैकी सुमारे ९ लाख १३ हजार विद्यार्थी परीक्षेला प्रत्यक्ष उपस्थित होते.

टेक्निकल पदांसाठी भरती! CDAC कडून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना दिलासा, आजच करा अर्ज

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल यंदा अपेक्षेपेक्षा थोडा कमी लागला असून, विद्यार्थ्यांच्या कामगिरीबाबत पालक, शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. इयत्ता पाचवीचा निकाल २३.०९ टक्के इतका लागला असून, इयत्ता आठवीचा निकाल त्याहूनही कमी म्हणजे १९.३० टक्के आहे. यामध्ये एकूण निकाल २२.०६ टक्के इतका लागल्याचे राज्य परीक्षा परिषदेने अधिकृतपणे जाहीर केले आहे. हे प्रमाण मागील काही वर्षांच्या तुलनेत थोडेसे घसरणारे असून, विद्यार्थ्यांच्या सरासरी शैक्षणिक प्रगतीबाबत चिंतेचे कारण ठरत आहे. यानंतर परिषदेने निकाल जाहीर करताना शाळांकडून गुणपडताळणीसाठी अर्ज मागवले होते. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या गुणांबाबत तक्रारी नोंदवून गुण तपासणीसाठी विनंती केली होती. ही संपूर्ण प्रक्रिया २५ एप्रिल ते ४ मे या कालावधीत पार पडली. या अर्जांची बारकाईने तपासणी करण्यात आली असून, सर्व आवश्यक सुधारणा केल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेने अंतिम निकाल जाहीर केला आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे.

या निकालाच्या आधारे इयत्ता पाचवीसाठी पात्र ठरलेल्या एकूण १६ हजार ६९३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना पुढील तीन वर्षांसाठी दरवर्षी ₹5,000 इतकी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे, इयत्ता आठवीसाठी पात्र ठरलेल्या १५ हजार ९३ विद्यार्थ्यांनाही पुढील दोन वर्षांसाठी दरवर्षी ₹7,500 इतकी रक्कम शिष्यवृत्तीच्या स्वरूपात दिली जाणार आहे. ही रक्कम दरवर्षी विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाते. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या मागास भागांतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळतो. शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च भागवता येतो आणि पुढील शैक्षणिक प्रवास अधिक सुसह्य होतो. अनेक पालकांना आपल्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक अडचणीमुळे मागे घ्यावे लागते, अशा वेळी ही शिष्यवृत्ती त्यांच्यासाठी मोठा आधार ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून त्यांचे शैक्षणिक जीवन उजळण्यास मदत होते. राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे शिक्षणप्रेमी समाजात समाधान व्यक्त होत आहे.

NHPC अप्रेन्टिस पदासाठी जाहीर केली भरती! शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे केली जाईल नियुक्ती

ही शिष्यवृत्ती योजना ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात स्थैर्य आणण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना या योजनेमुळे भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी मोठा आधार मिळणार आहे. शिक्षणाच्या प्रवासात विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि स्थैर्य देणारी ही योजना अनेक घरांमध्ये आशेचा किरण ठरत आहे.

Web Title: Fifth and eighth scholarship results announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 06:10 PM

Topics:  

  • education news

संबंधित बातम्या

Exclusive Series : बालविवाहपासून नेतृत्वापर्यंत! पारधी समाजातील महिला-मुलींच्या शिक्षणासाठी नानीबाईंचा संघर्षमय प्रवास
1

Exclusive Series : बालविवाहपासून नेतृत्वापर्यंत! पारधी समाजातील महिला-मुलींच्या शिक्षणासाठी नानीबाईंचा संघर्षमय प्रवास

पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेची गती मंद; आरटीईच्या चार हजार जागा रिक्त
2

पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेची गती मंद; आरटीईच्या चार हजार जागा रिक्त

Exclusive Series: आंबेवाडी गावात मुलांच्या नेतृत्वाखाली ‘शून्य बालविवाह’, परिवर्तनाने एकजूट आणि धाडसाने बालविवाहाचा अंत
3

Exclusive Series: आंबेवाडी गावात मुलांच्या नेतृत्वाखाली ‘शून्य बालविवाह’, परिवर्तनाने एकजूट आणि धाडसाने बालविवाहाचा अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.