Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NTA Reforms: NTA ला संपवणे हा योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या याबाबत युजीसीचे माजी चेअरमन नेमकं काय म्हणाले?

NTA Reforms: पेपर लीक प्रकरणांनंतर NTA वर उपस्थित झालेल्या प्रश्नांवर युजीसीचे माजी चेअरमन मामिडाला जगदीश कुमार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. NTA ला बळकट करण्याबाबत त्यांचे विचार सविस्तर जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 23, 2026 | 05:39 PM
NTA

NTA

Follow Us
Follow Us:

NTA Reforms: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) गेल्या काही काळापासून सतत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. काही दिवसांपूर्वी युजीसी नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात दिल्लीतील जंतरमंतरवर अनेक दिवस आंदोलन केले होते, ज्यानंतर देशाच्या शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. या सर्व प्रकरणांची आग अजून थंडावली नाही तोच आता युजीसी नेट परीक्षेतही गडबड समोर आली. या घटनांमुळे आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की, NTA ला पूर्णपणे बदलून टाकले पाहिजे का? याच प्रश्नावर युजीसीचे माजी चेअरमन मामिडाला जगदीश कुमार यांनी आपले मत मांडले आहे.

ते सध्या NEP 2020 च्या पुनरावलोकन समितीचे चेअरमन देखील आहेत. पीटीआयशी बोलताना त्यांनी सांगितले की, NTA संपवून नवीन एजन्सी तयार करणे हा योग्य मार्ग नाही, तर तिला आतून मजबूत करण्याची गरज आहे. त्यांच्या मते, दरवर्षी एक कोटीहून अधिक विद्यार्थी NTA च्या परीक्षा देतात, त्यामुळे हा मुद्दा फक्त एक एजन्सी बदलण्याचा नसून संपूर्ण यंत्रणा सुरक्षित बनवण्याचा आहे.

एकच एजन्सी का महत्त्वाची आहे?

कुमार यांनी सांगितले की, परीक्षा वेगवेगळ्या एजन्सींमध्ये वाटून टाकणे हा कोणताही उपाय नाही. कामाचा ताण कमी दाखवण्यासाठी परीक्षा अनेक एजन्सींमध्ये विभागणे योग्य ठरणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी स्पष्ट केले की, एकच राष्ट्रीय टेस्टिंग बॉडी असल्यामुळे सुरक्षेचे नियम, तंत्रज्ञान, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि निकाल तयार करण्याची पद्धत एकसारखी राहते. जर अनेक नवीन एजन्सी तयार केल्या तर खर्चही दुप्पट होईल आणि प्रत्येक ठिकाणचा सुरक्षेचा स्तर वेगवेगळा होईल.

यासोबतच त्यांनी रामकृष्णन समितीच्या शिफारसींचाही उल्लेख केला, ज्यामध्ये असे म्हटले होते की, ज्या मंत्रालयाला किंवा संस्थेला परीक्षा घ्यायची आहे, त्यांनी सिलॅबस, विषय तज्ज्ञ आणि प्रश्नांच्या गुणवत्तेची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे. तर NTA ने सुरक्षित प्लॅटफॉर्म, परीक्षा केंद्रांचे जाळे, विद्यार्थ्यांची ओळख तपासणे आणि निकाल तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सरकारने जुलैमध्ये सांगितले होते की, समितीच्या ४६ पैकी ३५ मोठ्या सूचनांवर आधीच काम सुरू झाले आहे, जसे की सुमारे ६०० तज्ज्ञांना बदलणे आणि प्रश्नांची चार स्तरांवर तपासणी सुरू करणे.

AIAPGET २०२६ परीक्षा केंद्रावर वीज गेल्याने रद्द; आता ‘या’ दिवशी होणार पुन्हा परीक्षा, जाणून घ्या सविस्तर!

पुढे काय करणे गरजेचे आहे?

कुमार यांनी तीन मोठ्या सुधारणांना सर्वात महत्त्वाचे मानले.
१. पहिली सुधारणा: संपूर्ण परीक्षा प्रक्रिया सुरक्षित बनवणे, म्हणजेच प्रश्न तयार करण्यापासून ते छपाई, स्टोरेज आणि केंद्रापर्यंत प्रत्येक टप्प्याची संपूर्ण नोंद ठेवली जावी.
२. दुसरी सुधारणा: टेस्ट डिझाईन, सायबर सुरक्षा, भाषा आणि लॉजिस्टिक्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये कायमस्वरूपी तज्ज्ञ टीम तयार करणे, जेणेकरून प्रत्येक वेळी नवीन लोकांना ठेवावे लागणार नाही.
३. तिसरी सुधारणा: परीक्षा केंद्र आणि विद्यार्थ्यांच्या सुविधा पूर्णपणे विश्वासार्ह बनवणे, ज्यामध्ये सीसीटीव्ही देखरेख, बायोमेट्रिक तपासणी, वीज आणि इंटरनेटची सुविधा तसेच प्रशिक्षित कर्मचारी यांचा समावेश असेल.

UPSC CDS 2 परीक्षा २०२६ चे प्रवेशपत्र लवकरच होणार जाहीर; १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेची जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..

कुमार यांच्या मते, NTA कडे आधीपासूनच अनुभव, तंत्रज्ञान आणि परीक्षा केंद्रांचे मोठे जाळे उपलब्ध आहे, त्यामुळे तिला संपवण्यापेक्षा अधिक मजबूत करणे हा जास्त योग्य मार्ग आहे.

Web Title: Mamidala jagadesh kumar on nta reforms and future

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • education
  • Exam
  • National Testing Agency

संबंधित बातम्या

AIAPGET २०२६ परीक्षा केंद्रावर वीज गेल्याने रद्द; आता ‘या’ दिवशी होणार पुन्हा परीक्षा, जाणून घ्या सविस्तर!
1

AIAPGET २०२६ परीक्षा केंद्रावर वीज गेल्याने रद्द; आता ‘या’ दिवशी होणार पुन्हा परीक्षा, जाणून घ्या सविस्तर!

सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या UPSC परीक्षेचा संपूर्ण पॅटर्न आणि पेपर्सचे गणित!
2

सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या UPSC परीक्षेचा संपूर्ण पॅटर्न आणि पेपर्सचे गणित!

शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव! ‘National Teachers Awards 2026’ मध्ये देशभरातील ‘या’ शिक्षकांची निवड
3

शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव! ‘National Teachers Awards 2026’ मध्ये देशभरातील ‘या’ शिक्षकांची निवड

BAMS vs BHMS? तुमच्या करिअरसाठी कोणता कोर्स आहे बेस्ट; जाणून घ्या सविस्तर..
4

BAMS vs BHMS? तुमच्या करिअरसाठी कोणता कोर्स आहे बेस्ट; जाणून घ्या सविस्तर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.