
अनैतिक संबंधातून महिलेकडून एकावर चाकूने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ
पुणे : पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे. वाढत्या गंभीर गुन्हेगारीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता अनैतिक संबंधातून एकावर महिलेने चाकूने वार केल्याची घटना मंगळवार पेठेत घडली आहे. या प्रकरणी महिलेसह तिघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रेश्मा रज्जाक शेख (वय ४०), रुखसार जावेद कोडगनुर (वय २३), सोहेल रज्जाक शेख (तिघे रा. भराव वस्ती, जुन्या बाजाराजवळ, मंगळवार पेठ) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३७ वर्षीय व्यक्तीने फरासखाना पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी रेश्मा हिचे तक्रारदाराशी गेल्या १६ वर्षांपासून अनैतिक संबंध आहेत. तक्रारदार तरुण तिला खर्चासाठी नियमित पैसे द्यायचा. आरोपी रेश्माने तिच्या एका मित्राला दुचाकी वापरण्यास दिली होती. या कारणावरुन २८ जुलै रोजी रात्री त्यांच्यात वाद झाला. वादातून आरोपी रेश्माने तक्रारदार तरुणाला शिवीगाळ करुन त्याच्या गालावर चाकूने वार केला. रेश्मा हिची विवाहित मुलगी आणि साथीदाराने तरुणाला शिवीगाळ करुन मारहाण केल्याचे तक्रारदार तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार खिलारे तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : मोठा दरोडा टाकण्याचा प्लॅन फसला, सहा आरोपींना पोलिसांनी पकडले; नेमकं काय घडलं?
तरुणासह त्याच्या आई-वडिलांना बेदम मारहाण
घराच्या बांधकामासाठी साहित्य घेऊन आलेल्या तरुणाला घरासमोरून वाहन नेत असल्याच्या कारणावरून अडवून त्याच्यासह त्याच्या आई- वडिलांना मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना २८ जुलै राजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बंबाटनगरात घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. छाया कदम, बालाजी कदम, अर्जुन कदम आणि अन्य एक अशी मारहाण करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कल्पेश राजू सूर्यवंशी (वय २६, रा. बंबाटनगर, बीड बायपास) यांनी फिर्याद दिली आहे.