
धडा शिकवण्यासाठी रचला कट... आसाममध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, विटांनी ठेचून केली निर्घृण हत्या
घरात एकटी असण्याचा घेतला फायदा…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी रात्री पिडित मुलीची आई आणि लहान भाऊ एका कार्यक्रमाला जाण्यासाठी घरातून निघाले. यावेळी मुलगी एकटीच घरी होती. कार्यक्रमावरुन आई आणि भाऊ जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांना मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. प्राथमिक माहितीनुसार, विटांनी ठेचून मुलीची हत्या करण्यात आली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या गुप्तांगात एक वस्तू घुसवण्यात आली होती. तपासात ही वस्तू डाळी घुसळण्यासाठी वापरले जाणारे एक भांडे असल्याचे स्पष्ट झाले. वापरण्यात आलेलं हे भांड पिडितेच्याच स्वयंपाकघरातून घेण्यात आलं होतं.
५ आरोपींना अटक
हैलाकांडीचे वरिष्ठ पोलिस अधिकारी (SSP) अमिताभ सिन्हा यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात कुणी घरात जबरदस्तीने घुसल्याची चिन्हे दिसून आली नाही, ज्यामुळे आरोपी ओळखीतलाच असल्याचा संशय होता.सुरुवातीला पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आणि नंतर दोन जणांना ताब्यात घेतले. अटक केलेले पाचही आरोपी किशोरवयीन असून यातील एक मुलगा अल्पवयीन (१६ वर्षे) असल्याचे स्पष्ट झालंय. मुख्य म्हणजे आरोपी अनोखळी नसून सर्व पिडितेला आधीपासून ओळखत होते.
धडा शिकवण्यासाठी कट रचला
चाैकशीत स्पष्ट झालं की, पिडित मुलीचे आरोपींपैकी एका १८ वर्षांच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तपासात हे देखील उघड झालं की, मुलीचे आणखी एका मुलासोबत अफेअर सुरु होते. आरोपींपैकी एकाने स्पष्ट केले की, यावरुनच संतापून मुलीला धडा शिकवण्यासाठी त्यांनी तिला मारण्याची योजना आखली. ज्या रात्री मुलीची हत्या करण्यात आली त्या दिवशी ती घरात एकटी असल्याची माहिती कथित प्रेमीला आधीपासून होती. त्यानंतर तो त्याच्या दोन मित्रांसोबत घरी आला, त्याचवेळी आणखी एक तरुण त्याच्या मित्रासोबत तिथे आले आणि सर्वांनी मिळून मुलीवर हल्ला चढवला.
‘फटाका’ सायलेन्सरवाल्यांनो सावधान! पुणे पोलिसांचा धडाका, तीन दिवसांत तब्बल…
कायदेशीर कारवाई
पोलिसांनी या प्रकरणातील पाच आरोपींना ताब्यात घेतलं असून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, हत्या आणि POCSO Act अंतर्गत लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पोलिस सध्या वैज्ञानिक आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम करत आहे. या पुराव्यांच्या आधारावरच आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर घटनेमुळे स्थानिकांद्वारे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आंदोलने केली जात आहेत.