
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं प्रकरण काय?
आरोपीचं नाव कुणाल कुमार असे आहे. कुणाल हा अमली पदार्थांच्या आहारी गेलेला असून व्यसनी आहे. घटनेच्या वेळी अंशू देवी ही घरात एकटी होती. कुटुंबातील इतर सदस्य शेतात कामासाठी गेले होते. शेतातून घरी परतल्यानंतर कुणालने अंशू देवीला जेवण मागितले. मात्र जेवण वाढण्यास थोडा उशीर झाला. तो प्रचंड चिडला. संतापून त्याने घरात असलेली कुर्हाड उचलली आणि अंशू देवीवर प्राणघातक हल्ला केला. यामुळे अंशूदेवी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
पळून जाण्या ऐवजी…
हत्या केल्यानंतर तो पळून जाण्याऐवजी त्याने धडापासून शीर वेगळा केला आणि थेट शीर झाडाला लटकावला. त्यानंतर तो रक्ताने माखलेल्या अवस्थेत घराच्या बाहेरच शांतपणे बसून राहिला. या हत्येची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. झाडाला लटकवलेले शीर आणि मृतदेह पाहून ग्रामस्थ सुन्न झाले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलीस घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.
आरोपी अटकेत
पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली कुर्हाड जप्त केली. आरोपी कुणाल कुमारला घटनास्थळावरून अटक केली. सध्या पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
सासरा-सुनेच्या अफेअरने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त, पत्नीला विष देऊन मारले; बाप-लेक गळफास अवस्थेत सापडले
बिहारच्या नालंदा जिल्ह्यातून हत्याकांडाचे एक खळबळजनक प्रकरण समोर येत आहे. रातोरात संपूर्ण कुटुंब संपल आणि या हत्यामागचं कारण सासू-सुनेचं अफेअर ठरलं. वडिलांचे आणि पत्नीचे अनैतिक संबंध उघड होताच पती संतापला आणि त्याने विष देऊन पत्नीचा खून केला. यानंतर वडिल आणि भावाचाही मृतदेह गळफास अवस्थेत सापडला. या घटनेत सासरा आणि सूनेचा मृत्यू झाला असून दोन्ही भाऊ गंभीर अवस्थेत आहेत. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
‘बहुपत्नीत्वावर बंदी का नाही?’ सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला थेट सवाल, सरकारकडे मागितले उत्तर
Ans: बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यात.
Ans: जेवण वाढण्यास झालेला उशीर.
Ans: आरोपीला अटक करून हत्येत वापरलेली कुऱ्हाड जप्त केली.