
मोठी बातमी ! अभिजित दीपके यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल; शिक्षिकेनेच दिली तक्रार अन् नंतर...
लातूर : परवानगीशिवाय जिल्हा परिषद शाळेत प्रवेश करणे, शिक्षकांना धमकावणे आणि या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या आरोपाखाली कॉक्रोच जनता पार्टीचे संयोजक अभिजित दीपके आणि त्यांच्या ६ सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. शाळेतील शिक्षिका सय्यद समशादबानो खैरातअली यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.
शहरापासून दोन कि.मी. ‘उर्ध औसा’ येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत ही घटना घडली. दीपके हे त्यांचे सहकारी अजिंक्य शिंदे व इतर ४-५ अनोळखी व्यक्तींसह शाळेच्या आवारात अचानक घुसले. वर्गात प्रवेश करत विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बसले. पूर्वपरवानगी न घेता तेथील उपस्थितांना शैक्षणिक व शासकीय कामकाजाबाबत प्रश्न विचारू लागले. यामुळे शाळेचे नियमित कामकाज आणि अध्यापन अध्ययन प्रक्रियेत व्यत्यय आला, असे तक्रारीत म्हटले आहे.
‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले
शिक्षिकेला म्हणाले, लाज वाटत नाही का?
एका महिला शिक्षिकेला जाब विचारत आरोपींनी तिच्याशी गैरवर्तन केले. शिवीगाळ केली. लाज वाटत नाही का? अशा शब्दांत सुनावले. हे लोक फुकटचे पैसे खातात, असेही शब्द वापरले. आरोपींच्या अनधिकृत प्रवेश व वर्तनावर आक्षेप घेतला असता त्यांनी शिक्षिकेला निलंबित करण्याची धमकी दिली.
अन्य संस्थेचे विद्यार्थी असल्याचे दाखवले
आरोपींनी घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ अशा प्रकारे सादर करण्यात आला की, जणू काही इतर संस्थांमधील मुलांना शाळेत आणून बसवण्यात आले होते. ज्यामुळे शाळेची बदनामी झाली. दीपकेंच्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानावरून नवा वाद उद्भवला आहे.
लिपिक टायपिंग परीक्षेत गोंधळ
Bombay High Court लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेदरम्यान राज्यभरात गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले. 16 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी आणि परीक्षा व्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. परीक्षेदरम्यान आलेल्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला. काही केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे असून, संबंधित यंत्रणेने या प्रकाराची चौकशी करून परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’