Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सागरी किनारपट्टीची सुरक्षा आजही आहे वाऱ्यावरच! किनारपट्टीवर गस्त घालण्यासाठी आवश्यक असलेल्या २३ बोटी नादुरुस्त

मुंबईवरच्या २६/११ हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण होत असताना सागरी सुरक्षेत मोठी ढिलाई उघड झाली आहे. ६९ पैकी २३ बोटी नादुरुस्त, कर्मचाऱ्यांची कमतरता, सीसीटीव्ही नसणे आणि अनधिकृत बोटींची वाढ, यामुळे किनारपट्टी पुन्हा धोक्यात आहे

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 21, 2025 | 11:53 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • ६९ पैकी २३ सागरी गस्त बोटी नादुरुस्त; अनेक ठिकाणी सीसीटीव्हीही नाहीत.
  • ४६४ पैकी फक्त १७२ कर्मचारी नियुक्त—सुरक्षेवर मोठा ताण.
  • अनधिकृत बोटींची संख्या वाढली; तज्ञांच्या मते मुंबई पुन्हा ‘सॉफ्ट टार्गेट’.
विजयसिंह जाधव, मुंबई: मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्याला २६ नोव्हेंबरला १७ वर्षे पूर्ण होत आहेत. अशातच मुंबईसह राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील सुरक्षेबाबत अद्यापही फारशी सजगता बाळगली जात नसल्याचे दिसून येत आहे. किनारपट्टीवर गस्त घालण्यासाठी आवश्यक असलेल्या ६९ बोटींपैकी २३ बोटी नादुरुस्त असल्याची बाब समोर आली आहे. दुसरीकडे किनार्यावरील लॅन्डींग पॉईंट्सवर सीसीटीव्ही यंत्रणेचा अभाव आहे. समुद्र किनारी रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक कार्यरत नसतात. या शिवाय सागरी किनारपट्टीवर नोंदणी न केलेल्या अनधिकृत मासेमारी बोटींची संख्याही मोठी असल्याचे नुकतेच समोर आहे.
त्यामुळे भविष्यात जर मुंबई किनारपट्टीवर कुठे २६/११ सारखा हल्ला झाला तर त्याचे गंभीर परिणाम मुंबईकरांना भोगावे लागणार आहेत. २६/११ हल्ल्याच्या १७ वर्षपूर्तीच्या निमित्ताने सागरी असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Bangalore Crime: बंगळुरूतील मंदिरात थरारक घटना! 55 वर्षीय आईने पोटच्या मुलीवर कुऱ्हाडीने केला जीवघेणा हल्ला, काय घडलं नेमकं?

महाराष्ट्र राज्याची ८७७.९७ किमी अंतराची सागरी किनारपट्टी संपूर्ण सुरक्षित आहे, असा दावा शासकीय यंत्रणा करीत असल्या तरी ही किनारपट्टी आजही असुरक्षितच असल्याचे समोर येत आहे.२६/११ च्या हल्ल्याला आणखी तीन वर्षांनी दोन दशके होतील. मात्र या दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात घर करून आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या या हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेसाठी २३ नव्या कोऱ्या सागरी बोटी दाखल झाल्या. त्या आधी तट सुरक्षेसाठी ९ बोटी होत्या.

कर्मचाऱ्यांची संख्या अतिशय कमी

मुंबईतील सागरी तट सुरक्षेसाठी एकूण ४६४ जणांचा स्टाफ मंजूर करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात १७२ कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहे. यावरून कर्मचाऱ्यांची संख्याही कमी असल्याचे दिसून येत आहे. शहराची सुरक्षाव्यवस्था सुधारण्यात आली असली तरी सुरक्षिततेचे आव्हान कायम आहे. मुंबईची भौगोलिक स्थिती लक्षात घेता या मुंबई मायानगरीला सहज लक्ष्य केले होऊ शकत असल्याने सुरक्षा यंत्रणांना कायम अधिक सतर्क राहावे लागेल, असे सुरक्षा जाणकरांचे म्हणणं आहे.

अपुऱ्या पोलिसांमार्फत सुरू आहे गस्त

मुंबईतील गस्तीची स्थिती दुर्लक्षित आहे. सागरी पोलिस ठाणे एक हे माहीम फिशरमेन कॉलनीतून कार्यरत असले तरी सागरी पोलिस ठाणे दोनसाठी अक्सा चौपाटीवर जागा न मिळाल्याने बोरिवली पश्चिमेतील योगी नगर वसाहतीतून तात्पुरते काम सुरू आहे. या पोलिस ठाण्यांना कार्यकारी दर्जा अद्याप देण्यात आलेला नाही. सागरी सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांना केंद्राने तीन तर राज्य शासनाने २३ जलद नौका पुरवल्या आहेत. या नौकांद्वारे यलोगेट आणि सागरी पोलीस ठाण्यांतील अपुऱ्या पोलिसांमार्फत गस्त सुरू आहे.

दहशतवादी कारवायांचा धोका लक्षात घेऊन २६ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील समुद्रकिनारी ७० तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. निर्मनुष्य जेट्टी, बेटे तसेच खाडीच्या परिसरात फिरती गस्त सुरू आहे. याशिवाय वर्षातून दोनदा सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून ‘सागर कवच अभियान’ राबविले जाते. नादुरुस्त बोटी वापरण्यायोग्य व्हाव्यात यासाठी दुरुस्तीला प्राधान्य देण्यात आले आहे. – देवेन भारती, पोलिस आयुक्त, मुंबई

२६/११ च्या हल्ल्याला पुढल्या महिन्यात नोव्हेंबर १७ वर्षे पूर्ण होतील. मूठभर आलेल्या अतिरेक्यांनी बेसावध मुंबईला असे काही जागे केले की त्यानंतर सुरक्षेसंदर्भात आपण हलगर्जीपणा करत आहोत ते समोर आले. आणि आता पुन्हा एकदा आपली सुरक्षा व्यवस्था कमजोर पडत असल्याचे समोर आले आहे. जर वेळीच आपण सुरक्षेसंदर्भात कठोर पावले उचलली नाही तर दहशतवादी हल्ला पुन्हा होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. आताच जर सागरी सुरक्षेकडे लक्ष दिले नाही तर मुंबईवर पुन्हा दहशतवादी झूला होण्याची भिती शक्यता वाटत आहे. – देवेंद्र तांडेल, अध्यक्ष, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

Uttarpradesh Crime: अवैध प्रेमसंबंधातून भयानक कट; पुजाऱ्याची गळा दाबून हत्या, 48 तासांत प्रकरणाचा उलगडा

Web Title: Coastal security is still a matter of concern 23 boats required for coastal patrolling are out of order

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 11:53 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Madhyapradesh Crime: धक्कादायक! ऑनलाईन गेमिंगने घरादाराचा घात; पत्नी-मुलीसह घेतले विष
1

Madhyapradesh Crime: धक्कादायक! ऑनलाईन गेमिंगने घरादाराचा घात; पत्नी-मुलीसह घेतले विष

Pune News: मध्यरात्री अचानक गायब, फोनही बंद अन्…,Sinhagad Fort वर ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह आढळला; काय घडलं नेमकं?
2

Pune News: मध्यरात्री अचानक गायब, फोनही बंद अन्…,Sinhagad Fort वर ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह आढळला; काय घडलं नेमकं?

Uttar Pradesh Crime: दिरानेच वहिनीची विटेने केली हत्या; नंतर 25 फूट उंच छतावरून मारली उडी, कारण काय?
3

Uttar Pradesh Crime: दिरानेच वहिनीची विटेने केली हत्या; नंतर 25 फूट उंच छतावरून मारली उडी, कारण काय?

Amravati Crime: चिकनच्या तुकड्यावरून रक्तरंजित वाद! मावस भावानेच १२ वर्षांच्या मुलाची केली हत्या; अपघाताचा बनाव फसला
4

Amravati Crime: चिकनच्या तुकड्यावरून रक्तरंजित वाद! मावस भावानेच १२ वर्षांच्या मुलाची केली हत्या; अपघाताचा बनाव फसला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.