
crime (फोटो सौजन्य: social media)
कशी केली अटक
शहरात चोरीच्या घटना वाढल्यानंतर, विशेष पोलीस पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक सूत्रांची माहिती आणि मोबाईल सर्व्हिलांस मदतीने अखेर पोलिसांनी दोन संशयित महिलांचा शोध घेतला. चोरी केल्यानंतर त्या महिला पश्चिम बंगालला पळून गेल्या असल्याचं तपासात दिसून आलं. आरोपींच्या शोधात पोलीस पथक पश्चिम बंगालला पोहोचलं आणि मेदिनीपूर जिल्ह्यात छापा टाकून या दोन्ही बहिणींना अटक करण्यात आली.
कशी करायचे चोरी
या दोन्ही महिला आधी घरांमध्ये मोलकरीण म्हणून काम करत होते. सुरुवातीला, त्या घरात चांगलं काम करून कुटुंबीयांचा विश्वास संपादन करायच्या आणि नंतर जेव्हा त्यांना संधी मिळत होती. तेव्हा त्या सोन्या- चांदीचे दागिने, रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तूंची चोरी करायच्या. चोरी झाल्यानंतर, संशय येऊ नये म्हणून त्या घरकामासाठी त्या घरात पुन्हा जात नव्हत्या. त्यानंतर या दोघी महिला चोरी केलेले दागिने वितळवून रस्त्यावर भेटलेल्या लोकांना विकायच्या.
दोघीनी चोरीची दिली कबुली
एकीने पोलिसांकडे कबूल केले की तिने सेक्टर १२ मधील एका घरातून दागिने चोरले होते आणि त्यातील काही दागिने विकून ३ लाख रुपये मिळवले. दुसरीने सांगितले की, तिने ९ ऑक्टोबर रोजी सेक्टर ४९ मधील एका घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला होती. चोरी झाल्यानंतर, ती दिवाळीनंतर तिचं पतीसोबत पश्चिम बंगालला निघून गेली.
किती रुपयांची केली चोरी
या प्रकरणी सेक्टर-२४ पोलिसांनी पेंडेंट, चेन, मंगळसूत्र, अंगठ्या, नेकलेस, हिऱ्यांचे दागिने आणि 1,54,810 रुपये रोख जप्त केले. सेक्टर-49 पोलिसांनी सोन्याची बिस्किटे, बांगड्या आणि 1,34,500 रुपये रोख रक्कम ताब्यात घेतली. एकूण 88 लाख रुपयांची पोलिसांनी केले जप्त. दोन्ही बहिणींना अटक करण्यात आली असून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.
Ans: बहिणी
Ans: 88 लाख
Ans: बंगाल