
crime (फोटो सौजन्य: social media)
वरळी पोलिसांनी गौरी पालवे गर्जे आत्महत्येप्रकरणी अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे- आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर त्रास देणे, अपमान करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.वरळी पोलिसांनी रविवारी भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
निवेदन जारी
गौरी पालवे यांच्या आत्महत्या प्रकरणाबाबत अनंत गर्जे यांच्याकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. या निवेदनात म्हंटले आहे की, पत्नीच्या दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनंतर अनंत गर्जे यांनी दिनांक २४ रोजी मध्यरात्री वरळी पोलीस स्थानकात हजर झाले. कायद्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य रितीने पार पडावी, यासाठी अनंत गर्जे स्वखुशीने पोलिसांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. तपासाला सहकार्य करण्यासाठी त्यांनी स्वतःहून पोलिसांसमोर हजर होण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा आणि सत्य जनसमोर यावे, यासाठी ते तपास यंत्रणांना आवश्यक ती सर्व माहिती आणि मदत करायला तयार आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.
अंजली दमानियाने व्यक्त केली शंका
सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. गौरी पालवे यांच्या मृत्यूनंतर तिच्या आईवडिलांना वेदना सहन कराव्या लागत आहे. गौरीने गळफास लावून घेतल्यानंतर अनंत गर्जे यांनी तिचा मृतदेह नायर रुग्णालयात आणला. त्यावेळीच पोलिसांनी अनंत गर्जे यांना अटक का केली नाही? असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला.
Ans: वरळी
Ans: गौरी पालवे- गर्जे
Ans: अंजली दमानिया