crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
मुंबई: कुशीनगर एक्सप्रेसच्या (ट्रेन क्रमांक २२५३७) एसी कोच बी२ च्या बाथरूममध्ये एका मुलाचा मृतदेह मिळाला होता. या मृत्यूदेहमागचं गूढ उकलल आहे. गुजरातमधून तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याला मुंबईत आणणाऱ्या, ट्रेनमध्ये त्याची हत्या करून मृतदेह फेकून देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अमरेली पोलिसांनी सोमवारी आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विकास शाह आहे. आरोपी विकास हा मृत मुलाचा मावसभाऊ असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकासने आरोपीने शुक्रवारी सुरतच्या अमरोली भागातून मुलाचे अपहरण केले. त्यानंतर तो त्याला मुंबईत घेऊन आला. त्यानंतर तो कुशीनगर एक्सप्रेसच्या (ट्रेन क्रमांक २२५३७) एसी कोच बी२ च्या बाथरूममध्ये मुलाचा गळा दाबून खून केला. मृतदेह लपवण्यासाठी त्याने तो शौचालयाच्या डस्टबिनमध्ये टाकला आणि पळून गेला.
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे शनिवारी कुशीनगर एक्सप्रेस उभी होती तेव्हा पहाटे १ वाजताच्या सुमारास ट्रेनची साफसफाई सुरु असतांना कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला. तांत्रिक देखरेख आणि लोकेशन अलर्टच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात आला. तपासानंतर पोलिसांना कळले की सापडलेले मूल तेच होते ज्याच्या बेपत्ता होण्याचा आणि अपहरणाचा गुन्हा 22 ऑगस्ट रोजी सुरतमधील अमरोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की मुलाचे त्याच्या चुलत भावाने अपहरण केले आहे. या आधारावर अमरोली पोलिसांनी आरोपीचा मोबाईल नंबरवरून लोकेसन काढून त्याच्यावर पाळत ठेवून त्याचा माग काढण्यास सुरुवात केली. या संदर्भात, अमरोली पोलिसांचे पथक शुक्रवारी पहाटे 4 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोहोचले आणि त्यांनी रेल्वे पोलिसांकडून मुलाची आणि आरोपीची माहिती घेतली.
त्यानंतर त्यांना सांगण्यात आले की कुशीनगर एक्सप्रेसमधून एका मुलाचा मृतदेह सापडला आहे. त्यानंतर, मृतदेहाचा फोटो कुटुंबाला पाठवण्यात आला, जिथे कुटुंबाने पुष्टी केली की मृत हा तोच मुलगा आहे, ज्याचे अपहरण करण्यात आले होते. या घटनेने प्रकरण अपहरणापासून हत्येपर्यंत वळले. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधून मिळालेल्या सिग्नलच्या आधारे त्याला सुरतमध्ये ट्रॅक करण्यात आले आणि सुमारे एक किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा खटला गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत येतो. सुरुवातीच्या तपासात, कौटुंबिक कलह किंवा आरोपीचे मानसिक अस्थिरता हे हत्येमागील कारण असल्याचा संशय आहे. आरोपी मुलाला घेऊन मुंबईत कसा पोहोचला आणि कोणत्या परिस्थितीत त्याची हत्या करण्यात आली याचा तपास पोलिस करत होते. सध्या पोलिसांनी आरोपी चुलत भाऊ विकासला अटक केली आहे.