
खळबळजनक ! पत्नीसह तीन मुलींची पतीने केली हत्या; खुनाचे कारण वाचून बसेल धक्का
जयपूर : पत्नी आणि तीन मुलींची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी खाटूश्यामजवळच्या रिंगस येथून सिनेस्टाईल अटक केली. खून करून पसार झाल्याने त्याच्यावर २५ हजारांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते. कुटुंबातील चौघांची शुक्रवारी निर्घृण हत्या करून आरोपी राहुल झा हा नराधम फरार झाला होता. हत्येनंतर तो खाटूश्याम येथे पोहोचला. तेथे त्याने दर्शन घेतले.
एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. जवळचे पैसे संपल्याने त्याने हॉटेल मॅनेजरकडे अंगठी विकत घेण्यासाठी विचारणा केली. परंतु, ५०० रुपयांनाही आपण अंगठी ठेवणार नसल्याचे हॉटेल मालकाकडून कळाल्याने तो अंगठी विकण्यासाठी रिंगस येथे गेला. हृदयाचा थरकाप उडविणाऱ्या हत्याकांडानंतर आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथके स्थापन केली होती. ते आरोपीच्या मागावरच होती. आरोपी सापडत नसल्याने त्याची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस देण्याचेही जाहीर केले होते. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पोलिसांनी रिंगस गाठले आणि अंगठी विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी राहुल झा याला अटक केली.
दरम्यान, पोलिस सूत्रांनुसार तो प्रचंड आर्थिक संकटात होता आणि त्यामुळे कुटुंबासोबत त्याचे खटके उडत होते. त्यातूनच त्याने कुटुंबाला संपवण्याचा कट रचल्याचे समजते. आता याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला असून, तपासानंतरच हत्येचे खरे कारण समजू शकणार आहे.
धारदार शस्त्रांनी हल्ला करून तरुणाची हत्या
पोळ्यानिमित्त घरी आलेल्या तरुणाला मित्रांनीच कट रचून संपवल्याची घटना तहसील परिसरात घडली. आधी बारमध्ये दारू पाजली. त्यानंतर कसार भवन चौकाजवळ नेले. तेथे शस्त्राने हल्ला करून दगडाने ठेचले. गंभीर जखमी अवस्थेत तरुणाचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. मनीष चंद्रशेखर मोहिते (वय ३८, रा. महाल, कोतवाली) असे मृताचे नाव आहे.