crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
जळगाव जिल्ह्यातील एक धक्कदायक घटना समोर आली आहे. कुसुंबा गावात जुन्यवादातून गोळीबार आणि दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. हा गोळीबार अज्ञात हल्लेखोरांनी कुरिअर कर्मचाऱ्याच्या घरावर करण्यात आला. ही घटना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास गणपती नगर परिसरात घडली आहे.
Chandrapur Accident: चंद्रपूरमध्ये दुर्गादेवी विसर्जनात जनरेटरचा स्फोट; दोन महिलांसह सात जण जखमी
नेमकं काय घडलं?
कुरियर कंपनीत काम करणारे चंद्रशेकर पाटील हे पत्नीसोबत घरी जेवतांना घटना घडली. घराबाहेर तीन दुचाक्या थांबल्या आणि त्यावरून पाच ते सहा अज्ञात तरुण उतरले. त्यांनी शिवीगाळ करत दगडफेक सुरु केली. ज्यात घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि घराबाहेर लावलेली दुचाकीही फोडण्यात आली. यानंतरच काही हल्लेखोरांनी घराच्या दिशेने तीन वेळा गोळीबार केला. अचानक झालेल्या फायरिंगने पाटील कुटुंबीयांसह संपूर्ण परिसर हादरला. या गोळीबारात कुणीही जखमी झाल्याची माहिती नसली तरी घराचे आणि वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची तपासणी करून तीन गोळ्यांच्या पुंगळ्या जप्त केल्या. घटनास्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, या प्रकरणात पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे.
जुन्या वादातून हल्ला
या हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, जुन्या वादातून ही कारवाई झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.
माझ्याकडे पाहून का थुंकला? या किरकोळ कारणातून दोन कुटुंबात तुफान हाणामारी
जळगावच्या बिलवाडी गावात किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीत एकाच मृत्यू झाला आहे तर ११ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असून सर्व जखमींवर जळगावच्या शासकीय वैधकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. ही हाणामारी माझ्याकडे पाहून का थुंकला? झाल्याचे समोर आले आहे. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे. जळगावच्या जिल्हा रुग्णालयात प्रचंड तणावाचे वातावरण आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून गोपाळ आणि पाटील कुटुंबामध्ये वाद सुरु आहे. शनिवारी रात्री गोपाळ कुटुंबातील व्यक्तीच्या दुचाकीला पाटील कुटुंबातील तरुणांनी अडवून बाचाबाची केली होती. त्यानंतर आज रविवारी गावातील ग्रामपंचायत बांधकामस्थळी पुन्हा दोन्ही गट समोरासमोर आले आणि माझ्याकडे पाहून का थुंकला? या कारणावरून वाद चिघळला. लाकडी दांडे, पावड्या व अन्य साहित्य वापरून जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत एकनाथ गोपाळ यांचा मृत्यू झाला.
पुण्यात चोरांचा धुमाकूळ! दोनच दिवसात अनेक ठिकाणी घरफोड्या; लाखोंचा ऐवज चोरला