
कल्याणच्या कुख्यात जालीम गँगवर मोक्का कारवाई
Kalyan Crime : काही दिवसांपूर्वी कुख्यात ड्रग्ज तस्कर अमजद पठाण, काशिम वसईकर, कृष्णा हालेमणी, गणेश मुथू स्वामी आणि सद्दाम शेख यांना पोलिसांनी अटक केली होती. या कारवाईदरम्यान कल्याण पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईत सुमारे 34 कोटी रुपयांचा drugs हस्तगत करण्यात आल्याची माहिती आहे.
ही टोळी राज्यभरात ‘जालीम गँग’ या नावाने ओळखली जाते. अमजद पठाण याच्यावर केवळ ड्रग्ज तस्करीचेच नव्हे, तर हत्या, हत्येचे प्रयत्न अथवा वसुलीचा प्रयत्न, अपहरण यांसह इतर गंभीर गुन्ह्यांचेही आरोप आहेत.
संघटित पद्धतीने गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या या टोळीवर लगाम घालण्यासाठी कल्याण पोलिसांनी मोक्का कायद्याचा वापर केला आहे. या कारवाईमुळे कल्याण परिसरातील संघटित गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. कल्याण डीसीपी अतुल झेंडे,एसीपी अशोक होंनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाच्या तपास सुरू आहे ड्रग्स तस्कर अमजद पठाण याला अटक करण्यामध्ये डीसीपी स्कॉर्ड प्रमुख अनिल गायकवाड यांची महत्त्वाची भूमिका मानली जात आहे.
मात्र अमजद पठाण याची शूटिंग करताना पत्रकारांना धमकवायच्या प्रयत्न अमजद पठाण यांनी केला आहे या प्रकरणात देखील पोलिसांनी ठोस कारवाई केली पाहिजे अशी मागणी पत्रकार संघटनेने केली आहे.
Mumbai Crime: आधी घराचे भाडे भरले, नंतर अचानक गायब; १९ जणांची कोट्यवधींची फसवणूक