
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं घडलं?
कोल्हापुरात २० गुंठे जमिनीच्या वादातून भावानेच आपल्या सख्ख्या भावाचा आणि वडिलांचा कुऱ्हाड आणि खोऱ्याने वार करून निर्घृण खून केला आहे. हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव इथं रविवारी रात्री ही घटना घडली. वडील मारुती कुंडले आणि लागण भाऊ शीतल कुंडले अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर संशयित आरोपी संभाजी कुंडले यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर स्वतःहून हातकणंगले पोलीस ठाण्यात हजर झाले.
Crime News : बिबट्याच्या कातड्यांची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चौघांना ठोकल्या बेड्या
पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनासस्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा धाव घेऊन पंचनामा केला आहे. तर हत्या करणारा संभाजी कुंडले हा सराईत गुन्हेगार असून त्यानं 1999 ते 2000 मध्ये स्वतः च्या पत्नीला राॅकेल ओतून पेटवून मारलं होते त्यातून तो निर्दोष सुटला असून त्याच्या पत्नीची हत्येत सासूचा हात असल्याचे सिद्ध झाले होते. अशातच आता या क्रुर मुलाने वडील आणि लहान भावाचा खून केल्याने हिंगणगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पैशांच्या वादातून संताप अनावर; दगडी वरवंट्याने माजी सैनिक वडिलांची मुलानेच केली हत्या
कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात ठेवलेले नऊ हजार रुपये घेतल्याच्या संशयातून मुलानेच वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या वडिलांचे नाव दत्ताराम संभाजी केसरकर (वय ८३) असे आहे. ते मंकी सैनिक आहेत. ही घटना शाहूवाडी तालुक्यातील उचत येथे घडली. या प्रकरणी संशयित आरोपी संतोष दत्ताराम केसरकर याला पोलिसांनी अटक केली आहे.
Ans: 20 गुंठे जमिनीच्या वादातून हत्या झाली.
Ans: मारुती कुंडले (वडील) आणि शीतल कुंडले (भाऊ).
Ans: हत्या करून स्वतःहून पोलिस ठाण्यात जाऊन हजर झाला.