
police
Mhaswad Police : माण तालुक्यातील म्हसवड हे महत्वाचे शहर असून शहरात काही दुचाकी स्वार सुसाट झाले होते. “साहेब यांना जरा चाप लावाच” अशी मागणी म्हसवड शहरातील नागरिकांची होती. त्याचं पार्श्वभूमीवर म्हसवडचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक संदिप पोमन यांनी कारवाईचा बडगा उगरल्याने म्हसवडच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरात काही दुचाकी स्वार बेभान होऊन गाडी चालवत असत. शहरातील चांदणी चौक,महात्मा फुले चौक,स्टॅन्ड परिसर व शिंगणापूर चौक याठिकाणी गाड्या वाहतूकीच्या नियमांचे पालन न करता चालवल्याने काही जणांचा अपघात झाला आहे. त्यांच्यावर काही कारवाई होतं नसल्याने दुचाकीच्या वेगावर नियंत्रण राहिले नव्हते. ज्यामुळे येथे अपघात होऊन अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
President of India Salary: भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींचा पगार माहितीये का? जाणून घ्या तेव्हा आणि आताच्या मानधनातील मोठा फरक!
शिंगणापूर चौका पासून चांदणी चौक व नगरपालिका रोड वरून रहदारीच्या रस्त्यावर दुचाकी वेगाने व सुसाट पळवणारे काही तरुण आहेत. त्यांना कुणाचाच दबाव राहिला नसल्याने ते स्वैर गाडी चालवत होते. त्यात भर म्हणून अनेक अल्पवायीन मुले व मुलीसुद्धा शहरात वाहने सुसाट पाळविताना दिसत होती. त्यामुळे बेजबाबदार वृत्तीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.
अल्पवयीन मुलांना गाडी देऊ नका,अपघात झाल्यास आई-वडिलांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र, अल्पवायीन मुले गाडी चालविण्याचे प्रमाण वाढले, त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढत चालले असल्याचे म्हणणे स्थानिक नागरिकांचे आहे.
‘म्हसवड शहरात यापूर्वी अनेक अपघात झाले असून या सर्व परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोमण साहेब यांनी अशा लोकांना जरा चाप लावाच’ अशी मागणी म्हसवडच्या नागरिकांची होती.
त्याचं पार्श्वभूमीवर म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमण यांनी म्हसवड शहरातील अनेक स्वैर दुचाकीस्वार, जे सायलेंशरमधील पुंगळ्या काढून टाकून सगळ्या पेठेतून कर्कश आवाज करतात त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे म्हसवडचे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.