Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai: तीन गर्भपाताचा आरोप, 13 वर्षांचं नातं, तरीही आरोपी निर्दोष; न्यायालयाने दिली कारणं स्पष्ट

मुंबई सत्र न्यायालयाने 30 वर्षीय महिलेच्या तक्रारीतून विवाहित कॉर्पोरेट मॅनेजरला निर्दोष मुक्त केले. न्यायालयाने दोघांचे 13 वर्षांचे नाते हे पूर्णपणे सहमतीने असल्याचे नमूद केले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 11, 2025 | 10:29 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: एका महिलेने लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्याशी 13 वर्षे नातेसंबंध ठेवले आणि नंतर तिचा तीन वेळा गर्भपात केल्याचा धक्कादायक आरोप कॉर्पोरेट मॅनेजरवर केले होते. मुंबई सत्र न्यायालयाने कॉर्पोरेट मॅनेजरला 30 वर्षीय महिलेनं दाखल केलेल्या खटल्यातून निर्दोष मुक्त केलंय. न्यायालयाने आपल्या निकालात म्हंटले आहे की, हे नातेसंबंध दोघांच्याही संमतीने झाले होते. महिला ही सुशिक्षित होती, तिला आरोपीच्या विवाहित असण्यासह त्याची इतर संपूर्ण परिस्थितीची जाणीव देखील होती. आरोपीने तिच्याशी विवाह न केल्याने महिलेनं रागाच्या भरातच एफआरआय दाखल केला होता असे ही न्यायालयाने म्हंटल आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

२०१४ साली माटुंगा पोलीस ठाण्यात ३० वर्षीय महिलेने एफआयआर दाखल केली होती. महिलेच्या तक्रारीनुसार, ही घटना 2000 ते 2013 दरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणात सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला. युक्तिवादात त्यांनी म्हंटले की, आरोपी हा एका कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होता, आरोपीने आजारी असल्याचे भासवून महिलेला त्याच्या घरी नेले आणि नंतर तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास सुरवात केली. त्याने त्यामहिलेवर प्रेम असल्याचे सांगत तिला लग्नाचे आश्वासम देत तिच्यावर लैंगिक शोषण केलं.

Gadchiroli Crime: कंत्राटी परिचारिकेकडून ‘शारीरिक सुखा’ची मागणी; आत्महत्याप्रयत्नानंतर तालुका आरोग्य अधिकारी निलंबित

तीन वेळा गर्भपात

३० वर्षीय महिला ही तीन वेळा गर्भवती राहिली होती. २००१, २०१० आणि २०१२ साली तिन्ही वेळा तिने आरोपीच्या आग्रहावरून गर्भपात केला. याचे पुरावे सरकारी वकिलांनी सादर केले होते. जेव्हा आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला तेव्हा त्यांचे संबंध बिघडले. २०१३ मध्ये आरोपीने महिलेला धमकी देखील देण्यात आली. असे युक्तिवाद सरकारी वकिलांनी केले. युक्तीवादानंतर सात साक्षीदारांची तपासणी करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायाधीशांनी असा निर्णय दिला की, सरकारी वकिलांना त्यांचा खटला देखील सिद्ध करण्यास अपयश आलं. त्यांनी आरोपीच्या विवाहाच्या जीवनाबाबत तफावता असल्याचे निदर्शनात आणून देण्यास सांगितली होती.

महिलेने कबूल केलं की, 2001-02 मध्ये आरोपीच्या पत्नीला भेटली होती. याचा अर्थ असा की, जेव्हा तिने पहिल्यांदा आरोपीशी लैंगिक संबंध ठेवले तेव्हा तिला आरोपी हा विवाहित असल्याची पूर्णपणे कल्पना देखील होती. महिलेनं केवळ संबंध चालू ठेवलेच नाहीतर आरोपीच्या मुलाच्या जन्मानंतर कंपनीत मिठाई देखील वाटली होती, हे मान्य केलं होतं. असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले.

नेमकं काय म्हणाले न्यायाधीश

न्यायाधीश एस. एस. आडकरांनी सांगितलं की, जेव्हा संबंध सुरु झाले होते तेव्हा त्या महिलेचं वय हे सुमारे 30 वर्षे होते. ती एक प्रौढ महिला होती आणि तिच्यासोबत सुरु असलेल्या सर्व गोष्टींची तिला जाणीव देखील झाली होती, त्यामुळे महिलेची फसवणूक झाली असं म्हणता येणार नाही. जर तिला खोटी माहिती दिली असती तर, तिने ताबडतोब पोलीसात तक्रार करायला हवी होती, पण तिने तक्रार दाखल केली नाही असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या अशाच काही निर्णयांचा दाखला देताना न्यायाधीशांनी निष्कर्ष काढला की, लग्नाच्या खोट्या आश्वासनाखाली आणि फसवणूक सिद्ध करण्यासाठी कसलीही जबरदस्ती करणे गरजेचं नाही. याच प्रकरणात न्यायाधीश पुढे म्हणाले की, या प्रकरणातील दोघांचे शरीरसंबंध संमतीचेच होते. पीडितेला कोणत्याही प्रकारे जबरदस्ती, दिशाभूल किंवा चुकीची माहिती देण्यात आली नव्हती. तिने जे काही केलं ते तिने स्वत:च्या मर्जीनेच केलं आहे.

Akola Crime: अकोल्यातील बेपत्ता 3 अल्पवयीन मुलं सापडले; मुंबईच्या ट्रेनमधून तिघांना घेतले ताब्यात; मुलं गेली कुठे आणि कशी?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीची सुटका का झाली?

    Ans: नाते हे सहमतीने होते आणि महिलेला आरोपी विवाहित असल्याची जाणीव होती; फसवणुकीचे ठोस पुरावे नव्हते.

  • Que: महिलेच्या आरोपांमध्ये काय महत्त्वाचे मुद्दे होते?

    Ans: लग्नाचे खोटे आमिष, 13 वर्षांचे नाते, आणि तीन गर्भपात करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप.

  • Que: न्यायालयाने महिलेबद्दल काय निरीक्षण केले?

    Ans: ती सुशिक्षित, प्रौढ असून परिस्थितीची पूर्ण जाणीव होती; त्यामुळे फसवणूक सिद्ध होत नाही असे नमूद केले.

Web Title: Mumbaiaccused of three abortions a 13 year long relationship yet the accused was acquitted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 10:19 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Gadchiroli Crime: कंत्राटी परिचारिकेकडून ‘शारीरिक सुखा’ची मागणी; आत्महत्याप्रयत्नानंतर तालुका आरोग्य अधिकारी निलंबित
1

Gadchiroli Crime: कंत्राटी परिचारिकेकडून ‘शारीरिक सुखा’ची मागणी; आत्महत्याप्रयत्नानंतर तालुका आरोग्य अधिकारी निलंबित

Akola Crime: अकोल्यातील बेपत्ता 3 अल्पवयीन मुलं सापडले; मुंबईच्या ट्रेनमधून तिघांना घेतले ताब्यात; मुलं गेली कुठे आणि कशी?
2

Akola Crime: अकोल्यातील बेपत्ता 3 अल्पवयीन मुलं सापडले; मुंबईच्या ट्रेनमधून तिघांना घेतले ताब्यात; मुलं गेली कुठे आणि कशी?

Tire Thief Gang Arrested: दौलताबाद येथे गुड इअर कंपनीच्या गोदामातून टायर चोरीचा पर्दाफाश; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
3

Tire Thief Gang Arrested: दौलताबाद येथे गुड इअर कंपनीच्या गोदामातून टायर चोरीचा पर्दाफाश; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Pandharpur Crime: शेवाळामुळे मुलगा तळ्यात पडला, वाचवायला गेले दाम्पत्यही बुडाले; पंढरपूर तालुक्यात दुर्दैवी घटना
4

Pandharpur Crime: शेवाळामुळे मुलगा तळ्यात पडला, वाचवायला गेले दाम्पत्यही बुडाले; पंढरपूर तालुक्यात दुर्दैवी घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.