Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime: मुस्लिम कुटुंबावर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला, १२ जण गंभीर जखमी; नवी मुंबईतील धक्कदायक प्रकार

नवीमुंबई येथील तळोजा परिसरातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. काही लोकांनी मुस्लिम कुटुंबावर धारधार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याचं समोर आलं आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 09, 2025 | 01:55 PM
दारू न पाजल्याने व्यक्तीवर चाकूहल्ला

दारू न पाजल्याने व्यक्तीवर चाकूहल्ला

Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई: नवीमुंबई येथील तळोजा परिसरातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. काही लोकांनी मुस्लिम कुटुंबावर धारधार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याचं समोर आलं आहे. मुस्लिम कुटुंब एका गावातून शुक्रवाररी दुपारी नमाज अदा करून घरी परतत होते. या हल्ल्यात किमान १२ जण जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

Kolhapur News : उसाच्या शेतात नवजात अर्भक पुरल्याचा धक्कादायक प्रकार; खड्ड्याच्या शेजारी मिठाची पिशवी आणि…

प्राथमिक माहितीनुसार, स्थानिक स्तरावरील वैयत्तिक वादामुळे हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. हल्लेखोरांकडून धारधार शस्त्रं होती आणि त्यांनी मुस्लिम बांधवांवर थेट वार केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परंतु अद्याप कोणताही अधिकृत गुन्हा तळोजा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेला नाही आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, पोलिसांकडून आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु असून, त्यामुळे पीडित कुटुंबांना न्याय मिळण्यात अडथळे येत आहेत.

पिडीतांनी वारंवार तक्रारी केली परंतु पोलिसांनी गंभीरपणे दाखल घेतली नाही, उलट गुन्हा नोंदवण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्यामुळे पोलिसांवर रोष व्यक्त केला जात आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे आता या प्रकरणाची जबाबदारी आहे.

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि मुस्लिम संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. या हिंसक घटनेनंतर तळोजा परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून, पोलिसांकडून निष्पक्ष कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वेगवेगळ्या कारणावरुन विवाहीत महिला टोकाचं पाऊल उचलतांना दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात राज्यातील अनेक महिलांनी आत्महत्या केली आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील फुरसूंगीत पती व सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहत्या घरात तिने फॅनला ओढणीने गळफास लावून जीवन संपवले आहे.

सीमा अक्षय राखपसरे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती अक्षय सुरेश राखपसरे, चुलत सासरे, सासू आशाबाई सुरेश राखपसरे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रवि खलसे (वय ५०) यांनी फुरसूंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना बुधवारी (दि. ६ ऑगस्ट) घडली आहे.

अति हाव नडली! शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवले अन् ‘इतक्या’ कोटींना गंडवले; आरोपीला थेट ओडिशातून…

 

 

Web Title: Muslim family attacked with sharp weapons 12 people seriously injured shocking incident in navi mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2025 | 01:55 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: धावत्या लोकलमधून फेकला नारळ, डोक्याला लागून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; भाईंदर खाडी पूलावर दुर्दैवी घटना
1

Mumbai Crime: धावत्या लोकलमधून फेकला नारळ, डोक्याला लागून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; भाईंदर खाडी पूलावर दुर्दैवी घटना

Bihar Crime: बिहार हादरलं! पत्नीने दिराशी लग्न केल्याच्या रागातून जावयाने केली सासूची हत्या
2

Bihar Crime: बिहार हादरलं! पत्नीने दिराशी लग्न केल्याच्या रागातून जावयाने केली सासूची हत्या

Bihar Crime: घरी परतत असताना थांबवलं, शाळेत नेलं आणि… १३ वर्षीय मुलीसोबत घृणास्पद कृत्य
3

Bihar Crime: घरी परतत असताना थांबवलं, शाळेत नेलं आणि… १३ वर्षीय मुलीसोबत घृणास्पद कृत्य

Bihar Crime: रात्री पळून गेलेल्या शिक्षिकेचा सकाळी आढळला शेतात मृतदेह, मृत्यूमागील गूढ कायम; बिहार येथील घटना
4

Bihar Crime: रात्री पळून गेलेल्या शिक्षिकेचा सकाळी आढळला शेतात मृतदेह, मृत्यूमागील गूढ कायम; बिहार येथील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.