
crime ( फोटो सौजन्य - social media)
काय नेमकं घडलं?
मृतक आत्माराम पाटील हे माहितीच्या अधिकाराचा वापर करून विविध प्रकरणांमध्ये पाठपुरावा करणारे RTI कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. मंगळवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास आत्माराम पाटील हे वसई तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यासोबत शिरगाव येथील खदानी परिसरात गेले होते. ते व्हॅगनआर कारने घटनास्थळी पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
खदान मालक महेश भोईर याने त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. त्यानंतर झालेल्या वादातून आत्माराम पाटील यांच्यावर दगडाने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुरावे गोळा करण्यात आले आहे . आरोपीचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.
ही हत्या खदानीशी संबंधित वादातून झाली की अन्य कोणत्या कारणामुळे याचा तपास पोलीस करत आहे. पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. आरोपीचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.भरदिवसा घडलेल्या या हत्येमुळे विरार आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. RTI कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
वसई-विरार पट्ट्यात ‘मृतदेहांची मालिका’ सुरूच; 15 दिवसांत सहावी घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वसई-विरार आणि नालासोपारा पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून मृतदेह सापडण्याची मालिका सुरु आहेच. आता पुन्हा एकदा रविवारी सायंकाळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महामार्गावरील विरार फाटा येथे एका अज्ञात पुरुषाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह कचऱ्याजवळ आढळून आल्याचे समोर आले आहे. गेल्या १५ दिवसांत ही सहावी घटना आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळाला; जेवून येतो म्हणून गेला अन्…
Ans: मृत RTI कार्यकर्त्याचे नाव आत्माराम पाटील आहे.
Ans: ही घटना विरार पूर्वेतील शिरगाव खदानी परिसरात घडली.
Ans: या प्रकरणात खदान मालक महेश भोईर याचे नाव समोर आले आहे.