crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
ऐन बाप्पांच्या विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे शहरामध्ये एका टोळीने १८ वर्षीय तरुणाची हत्या केली. हत्या झालेल्या तरुणाचे नाव आयुष कोमकर(१८) असे आहे. वर्षभरापूर्वी (1 सप्टेंबर 2024) राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. याचाच बदला घेण्यात आला आहे. आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा 18 वर्षीय मुलगा आयुष कोमकर याला आंदेकर टोळीने टार्गेट करून हत्या केली. या हत्येनंतर पुणे पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना थेट इशारा देत म्हण्टक आहे की, चुकीला माफी नाही. प्रत्येक गोष्ट करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा.
जो जबाबदार असेल, त्याला कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही
पुणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी या गोळीबाराची माहिती देताना म्हटलं की, “या सगळ्या प्रकरणाचा दोन तासांत उलगडा झाला आहे. मयताचं नाव आयुष गणेश कोमकर आहे. तो क्लासवरून घरी आल्यानंतर बेसमेटमध्ये त्याच्यावर दोन जणांनी गोळ्या झाडल्या. आयुषचे वडील गणेश कोमकर हा मागील वर्षी झालेल्या वनराज आंदेकरच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. पोलीस प्रत्येक बाबींचा विचार करून चौकशी करत आहे. एकदम आततायीपणे निष्कर्षापर्यंत पोहोचणं योग्य नाही. या घटनेला जो जबाबदार असेल, त्याला कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही. प्राथमिकदृष्ट्या या प्रकरणात दोघांचा समावेश असल्याचं दिसून आलं आहे. मात्र यात आणखी लोक गुंतलेले असू शकतात, असा आम्हाला संशय आहे.”
गुन्हेगारांना थेट इशारा
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी म्हंटले पुण्यातील गुन्हेगारांना इशारा दिला आहे. या प्रकरणात कुणीही जबाबदार असला तरी त्याला सोडणार नाही. मयताला न्याय देणं आमचं काम आहे, असं पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितलं आहे. आता चुकीला माफी नाही, कोणताही गुन्हा करताना शंभर वेळा विचार करा, असा त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी याप्रकरणात सखोल तपास सुरू आहे, गुन्हा रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
कुठलाही गुन्हा करतांना १०० वेळा विचार करा
मयत व्यक्तीला न्याय देणं आमचं काम आहे, आणि आम्ही त्याला न्याय मिळवून देऊ. पोलीस आतापर्यंत चोखपणे आपलं काम पार पाडत आले आहेत. येथून पुढेही पार पाडू. गुन्हे रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. हा जो गुन्हा आहे, हा गुन्हा कुठल्याही चौकटीत कुणालाही माफ करण्यासारखा नाही. लोकांनी आम्हाला साथ द्यायची आहे. कोणीही, कुठल्याही अफवा पसरवायच्या नाहीत. चुकीची माहिती पसरवायची नाही. आम्ही आमचं काम निश्चितपणे पार पाडणार, येथून मागेही आम्ही आमचं काम पार पाडलं आहे. आता चुकीला माफी नाही. प्रत्येक गोष्ट करताना गुन्हेगारांनी १०० वेळा विचार करावा, आणि आम्हाला साथ द्यावी”, असंही पोलीस उपायुक्त पिंगळे यांनी म्हटलं आहे.
ज्योतिर्लिंग मंदिरातील चोरीचा तीन दिवसांत उलगडा; आरोपीला ठोकल्या बेड्या