
crime (फोटो सौजन्य: social media)
काय म्हणाले सियाचे वडील ?
सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी सांगितले की, ‘मीडियात चाललेल्या १४ ते १७ कोटी रुपयांच्या विमानांच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि चुकीच्या आहेत. लग्नासाठी कोणतेही खाजगी विमान (Private Jet) बुक करण्यात आले नव्हते. याबद्दल कधी कोणती चर्चाही झाली नव्हती. आम्ही आपापसात ठरवले होते की, जुलै महिन्यात दोन्ही कुटुंबे आपापली विमानाची तिकिटे स्वतः काढतील. पुण्यावरून आमच्या बाजूने साधारण ७० कपल्स जाणार होते. मी स्वतः पुण्यावरून अहमदाबाद आणि तिथून पुढे कारने हॉटेलपर्यंत जाण्याचे नियोजन पुढच्या महिन्यात करणार होतो. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.
Satara News : लग्नाची सनई वाजण्याआधीच पोलिसांचा सायरन! रहीमतपूरमध्ये १५ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला
लग्न जयपूरला नाही, तर…
जयपूरमध्ये कोणतेही हॉटेल बुक करण्यात आले नव्हते, तर उदयपूरमधील ‘अनंता रिसॉर्ट’ (Ananta Resort) बुक करण्यात आले होते. तिथे एका कपलचा ३ दिवसांचा खर्च साधारण ८७,००० रुपये होता. आमच्या बाजूने ६० ते ६५ खोल्या आणि मुलीच्या बाजूने १५० ते १५५ खोल्या बुक केल्या होत्या. ३ दिवसांचे बजेट, कार्यक्रम, जेवण या सर्वांचा मिळून हॉटेलचा एकूण खर्च २.७५ कोटी ते ३ कोटी रुपयांच्या दरम्यान होणार होता, असे सियाच्या वडिलांनी म्हंटल. पुढे म्हणाले
मुलगा-मुलगी एकमेकांना भेटल्यानंतर दीड-दोन तास त्यांची चर्चा झाली होती. त्यानंतर एका छोट्या कार्यक्रमात लग्न ठरले. १५ ऑगस्टला येणारा सण आणि घरातील माता की चौकीचा कार्यक्रम, तसेच हॉटेलचा सर्व खर्च मिळून सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत संपूर्ण लग्नाचा एकूण खर्च साधारण ४ ते ५ कोटी रुपयांच्या दरम्यान होणार होता. यापेक्षा मोठा कोणताही खर्च नव्हता.
सोन्या-चांदीच्या दागिन्यांबाबत दिली महत्त्वाची माहिती
आम्ही त्यांना काही गोष्टी दिल्या होत्या. त्यांनी देखील सियाला जे काही दिले होते, ते आम्ही तातडीने त्यांच्याकडे सुपूर्द केले होते. आमच्या घरात डिसेंबर महिन्यापासून नूतनीकरणाचे काम सुरू असून तिथे १० लोकांची टीम काम करत आहे. जर आम्ही पती-पत्नी बाहेर गेलो, तर मागे दागिन्यांची देखभाल कोण करणार? याच काळजीपोटी माझी पत्नी नेहमी त्यांना फोन करून सांगायची की, ‘दीदी, केतनकडे आम्ही हे दागिने परत देत आहोत, तुम्ही ते सांभाळा, आम्हाला ते इथे ठेवायचे नाहीत.’ त्यामुळे त्यांनी आजपर्यंत जे काही दिले होते, ते आम्ही त्यांना सुरक्षितपणे परत केले होते. असे देखील त्यांनी सांगितले.
Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ
Ans: केतन आणि सियाचे लग्न उदयपूरमधील अनंता रिसॉर्टमध्ये होणार होते.
Ans: 17 कोटींचा पॅलेस आणि खासगी विमान बुक केल्याच्या बातम्यांचे त्यांनी खंडन केले.
Ans: लग्नाचा एकूण खर्च साधारण 4 ते 5 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.