
वाळू माफियांचे थेट प्रशासनाला आव्हान! पोलीस पाटलांच्या ताब्यातून जप्त केलेली वाहने पळवली (Photo Credit- X)
गोदावरी आणि शिवना नदी पात्रात वाळू माफियांचा वाढता बेकायदेशीर कारभार आता थेट प्रशासनालाच आव्हान देऊ लागला आहे. महसूल पथकाने पकडलेली अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने पोलीस पाटलांच्या ताब्यात देण्यात आली; मात्र माफियांनी धाडसी पाऊल उचलत दमदाटी करून हीच वाहने पळवून नेली. या थरारक प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, माफियांच्या या डेअरिंगमुळे प्रशासनाला तातडीने ‘अॅक्शन मोड’वर यावे लागले, उपविभागीय अधिकाऱ्यांनी कडक कारवाईचे आदेश देत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिल्याने वाळू माफियांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील लाखणी येथे १५ फेब्रुवारी रोजी पहाटे १.४० वाजता जप्त करण्यात आलेले एमएच २० जीसी ५२६६ हे वाहन बादल सुभाष राजपूत (रा. झोलेगाव) यांचे असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र अधिकृत ताब्यात असलेले हे वाहन पहाटे ३ ते ४ दरम्यान दमदाटी करून स्वतःच पळवून नेल्याची नोंद आहे. लासूरगाव परिसरात १४ फेब्रुवारी रोजी पकडलेले एमएच २० जीझेड ५२१३ हे वाहन दिनेश शिंदे (रा. रोटेगाव) यांचे असल्याचे निष्पन्न झाले, तर विनाक्रमांक वाहन गणेश गायकवाड (रा. जळगाव) यांचे असल्याचे पुढे आले. ही दोन्ही वाहनेही पोलीस पाटलांच्या ताब्यातून जबरदस्तीने काढून नेण्यात आल्याची माहिती आहे. शासकीय ताब्यातील वाहने स्वतःच्या बळावर पळवणे हे वाळू माफियांच्या वाढत्या डेअरिंगचे उदाहरण मानले जात असून प्रशासनाने संबंधितांविरुद्ध कड़क कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
Nagpur Accident: भरधाव वेगात बुलेटवर स्टंट ठरला जीवघेणा; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन मित्रांचा मृत्यू
दरम्यान उपविभागीय अधिकारी अरुण जव्हाड यांनी संबंधित वाहन मालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३५१, ३०३ व १३२ अंतर्गत तसेच महाराष्ट्र गौण खनिज कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. शासकीय कामात अडथळा आणणे आणि सार्वजनिक मालमत्तेची चोरी केल्याबद्दल कठोर कारवाई करण्याबरोबरच मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ८६ नुसार संबंधित वाहनांचे परवाने निलंबित करून वाहने जप्त ठेवण्याबाबत आरटीओला स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
वैजापूरचे उपविभागीय अधिकारी, अरुण जन्हाड जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आली असून, २ दिवसांच्या आत अनुपालन अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाळू माफियांच्या वाढत्या दादागिरीला लगाम चालण्यासाठी महसूल, पोलीस आणि परिवहन विभाग यांच्यात समन्वय वाढवण्यात आला आहे. संबंधित माफियांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Amravati Crime: अमरावतीत भीषण अपघात! इलेक्ट्रिक बस-रिक्षा धडकेत शाळकरी मुलासह ५ जणांचा जागीच मृत्यू