
Tuljapur News: तुळजापूरमध्ये अवैध धंदे वाढले; नगराध्यक्षांचा पोलिसांना इशारा (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील आरोपीचे नाव अंकुश बाळू वाघमारे (वय ३७, मूळ रा. गायमळा आदिवासी पाडा, ता. सुधागड, जिल्हा रायगड) असे नाव आहे. पोलिसांनी अंकुशला अटक केली आहे. मंगल वाघमारे या पती अंकुश बाळू वाघमारे यांच्यासह निंबवडे गावाबाहेरील ओढ्यालगत रामचंद्र मोटे यांच्या शेतात खोपटे बांधून वास्तव्यास होत्या. हे कुटुंब कोळसा तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय करत होते. त्यांच्यामागे काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु होते. अंकुश वाघमारे हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार पत्नीशी भांडण करत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
कशी केली हत्या?
१९ मार्च रोजी सकाळी दोघांमध्ये वाद झाला होता. मात्र नातेवाईकांनी हस्तक्षेप करून तो वाद मिटवला होता. रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडण सुरु झाले. यावेळी मंगल वाघमारे हिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिचा भाऊ, वहिनी तसेच इतर नातेवाईक धावत घटनास्थळी गेले. अंधार असल्याने त्यांनी मोबाइलच्या उजेडात ओपाहिले तेव्हा अंकुश हा मंगल हिला लाकडाने मारहाण करत होता. नातेवाइकांना पाहताच तो घटनास्थळावरून पसार झाला.
या मारहाणीत मंगल हि गंभीर जखमी झाली होती. मंगल हिल निंबवडे गावात आणण्यात आले. रुग्णवाहिकेमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर मंगल वाघमारे हिला मृत घोषित केले. त्यानंतर आटपाडी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह आटपाडी येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई करत आहे.
Ans: सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथे.
Ans: मंगल अंकुश वाघमारे.
Ans: पतीने लाकडाने मारहाण करून.