काय घडलं नेमकं?
अमेठीच्या गौरीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिगुर हृदय शाह गावात एक धक्कादायक घटना घडली. रेखाचा विवाह काही वर्षांपूर्वी भालेसुल्तान येथील मांसाहाराम याच्याशी झाला होता. मंशारामचे एका तरुणीवर प्रेम होते आणि लग्नानंतरही तो तासंतास तिच्याशी फोनवर बोलत असे. याची कुणकुण रेखाला लागली होती. रेखाने अनेकवेळा या नात्याला विरोध केला आणि पाटील सुधारण्याचा प्रयत्न केला. मात्र मंशारामने तिचे ऐकण्याऐवजी तिला कायमचे वाटेतून बाजूला काढण्याचा कट रचला.
कशी केली हत्या?
१६ मार्च रोजी जेव्हा रेखा होळीच्या सणासाठी आपल्या माहेरी गेली होती. तेव्हा मंशारामने तिला एका शेतात भेटण्यासाठी बोलावले. रेखा तिथे पोहोचताच त्याने लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यावर वर्मी घाव घालून तिची निर्घृण हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून पुरावे गोळा केले. सुरुवातीला मृत महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र तपासादरम्यान पोलिसांना एक महत्वाचा धागा मिळाला. घटनेच्या दिवशी आरोपी मंशाराम याच्या दुचाकीचे पोलिसांनी एका ठिकाणी चलान फाडले होते, ज्यामुळे त्याचे लोकेशन संशयाच्या भोवऱ्यात आले.
आरोपी अटकेत
पोलिसांनी विविध पथके तयार करून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मंशारामचा शोध घेतला आणि अखेर त्याला अटक केली. पॉलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि प्रेयसीशी असलेल्या संबंधात पत्नी अडथळा ठरत असल्याने तिची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले साधन जप्त केले असून आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. सुखाचा संसार उधळून लावून प्रेमासाठी स्वतःच्या पत्नीचा बळी घेणाऱ्या या नराधम पतीच्या कृत्याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
Ans: उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात.
Ans: शेतात बोलावून लाकडी दांडक्याने डोक्यावर वार करून.
Ans: पतीच्या विवाहबाह्य संबंधात पत्नी अडथळा ठरत होती.






