
crime (फोटो सौजन्य: social media)
जाणीवपूर्वक वणवा लावाल तर….; Satara वनविभागाची मोठी कारवाई, एक आरोपी अटकेत
काय घडलं नेमकं?
या घटनेतील आरोपी वडिलांचे नाव आहे. तो एका बेकरीमध्ये कामाला आहे. त्याला एकूण सहा अपत्ये आहे. या प्रकरणातील मृत झालेल्या मुलीचे नाव रेशमा (वय १७) असे आहे. रेश्मा ही सर्वात मोठी मुलगी. रेशमाचे गावातीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. याचा घरच्यांना सुरुवातीपासून तीव्र विरोध होता. कुटुंबीयांनी तिला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने कोणाचंच ऐकलं नाही.
कशी केली हत्या?
बुधवारी पहाटेच्या सुमारास नजाकतने आपल्या मुलीच्या प्रियकराला घराबाहेर पडताना पाहिले. यामुळे त्याचा राग अनावर झाला. मुलगी गाढ झोपेत असतांना पहाटे ४ वाजताच्या सुमारास नजाकतने तिचा गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नजाकतच्या घरातील एका खोलीत मुलीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
पोलिसांनी नजाकतला पॉलिसी खाक्या दाखवताच आपला गुन्हा कबूल केला. “मी एका मुलाला रात्री घरून बाहेर पडताना पाहिले, त्यामुळे मला प्रचंड राग आला आणि मी तिची हत्या केली,” अशी कबुली त्याने दिली आहे. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहे. एका प्रेमसंबंधावरून बापानेच मुलीचा जीव घेतल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
Ans: उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील बिन्जाहेडी गावात.
Ans: मुलीचे प्रेमसंबंध असल्याच्या रागातून वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
Ans: आरोपी वडिलांना अटक करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.