
crime (फोटो सौजन्य: social media)
दुचाकीवरून निघालेल्या तरुणांना रिक्षाचालकाकडून बेदम मारहाण; साथीदारांना बोलावलं अन्…
काय घडलं नेमकं?
दिवस २१ मार्च २०२१, अगर जिल्ह्यातील हरिपर्वत ठाण्याच्या खंदारी परिसरात एक अशी घटना घडली जी माणुसकीला काळिमा फासणारी घटना होती. एखादा व्यक्ती एवढा क्रूर कस असू शकत याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. प्रेमात आपण एक दुसऱ्याला काही होऊ देत नाही. आपल्या प्रिय व्यक्तीला साधा ताप जरी असला की आपल्याला खूप दुःख होत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक स्त्री किंवा मुलगी हे मनाने खूप हळव्या असतात मग एक स्त्री एवढं क्रूर कशी वागू शकते असा प्रश्न आता पडलाय. या प्रकरणात आरोपी स्त्री आहे.
आरोपी महिलेचं नाव सोनम पांडे असे आहे. औरेया जिल्ह्यातील रहिवासी असलेली सोनम ही व्यवसायुईकाने नर्स आहे. तीच कासगंज येथील देवेंद्र नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होतं. सगळं काही सुरळीत सुरु असत. मात्र देवेंद्रचं दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरलं. हे बातमी सोनमला समजताच तिच्या मनात उलथापालट झाली. तिने त्याला मारण्याचा कट रचला.
२१ मार्च २०२१ रोजी तिने देवेंद्रला बिघडलेला पंखा ठीक करण्याच्या बहाण्याने देवेंद्रला आपल्या खोलीत बोलावलं. तिथे लग्नावरून त्यांच्यात मोठा वाद झाला आणि रागाच्या भरात सोनमने देवेंद्रवर अॅसिड ओतलं. तो या निर्दयी हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
देवेंद्रने मृत्यूपूर्वी रुग्णालयात पोलिसांना जबाब दिला होता. त्या जबाबात त्याने घडलेला सगळं प्रकार सांगितलं होता. हा जबाब या प्रकरणातील एक महत्त्वाचा पुरावा ठरला. पोलिसांनी तपासादरम्यान सोनमच्या खोलीतून एक लीटर अॅसिडचा डबा जप्त करण्यात आला होता.
मदतीसाठी गेलेल्या ‘त्या’ नराधमानेच गर्भवतीची केली हत्या; लग्न करण्याचे आमिष दाखवत सातत्याने संबंध
हा डबा कोर्टात सादर करण्यात आला आणि तो निर्णायक पुरावा ठरला. विविध साक्षीदार, फॉरेन्सिक अहवाल, वैद्यकीय पुरावे आणि इतर साक्षी पुरावे सादर करण्यात आले. यातून हत्या ही पूर्वनियोजित, जाणीवपूर्वक आणि क्रूर असल्याचं स्पष्टपणे सिद्ध झालं. कोर्टाने या निरदर्यी हत्येची दखल घेत सोनम पांडे हिला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच तिला 40 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास शिक्षा आणखी वाढवली जाऊ शकते. सुरुवातीला या प्रकरणात सोनमला जामीन मिळाली होता, परंतु लांब सुनावणीनंतर ती दोषी ठरली आणि आता तिला आयुष्यभर तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
Ans: आग्रा जिल्ह्यातील खंदारी परिसरात.
Ans: प्रियकराचं दुसरीकडे लग्न ठरल्याचा संताप.
Ans: आजन्म कारावास आणि ४० हजार रुपयांचा दंड.