Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आम्ही किती अन् काय मागावे? याचे भान ठेवलं पाहिजे”; शिंदे गटाच्या नेत्याने मुख्यमंत्रिपदाबाबत थेट सांगितलं

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारण रंगले आहे. आता मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली असून मुख्यमंत्री भाजपाचाच असेल हे स्पष्ट झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 28, 2024 | 04:28 PM
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही माझी...; एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगून टाकलं

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही माझी...; एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगून टाकलं

Follow Us
Close
Follow Us:

शिर्डी : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे. निकाल हाती आला असून महायुती सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असताना एकतर्फी निकाल लागल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. विरोधी पक्षनेता म्हणून देखील विरोधकांना दावा करता येणार नाहीये. विरोधकांनी ईव्हीएम मशीनमध्ये फ्रॉड केला असल्याचा दावा केला आहे. यावरुन आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे.

शिंदे गटाचे नेते रामदास कदम हे शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. परिवारासोबत दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रामदास कदम म्हणाले की, “साईबाबांनी महायुतीला मोठा कौल दिला आहे. दोन दिवसांत महायुतीचे सरकार बनेल. महाराष्ट्रातील जनतेने 18 ते 20 तास महाराष्ट्रात काम करणारा मुख्यमंत्री पाहिला. ते व्यक्तीमत्व म्हणजेच एकनाथ शिंदे आहे. मागच्या वेळी आमचा आकडा कमी असताना आम्हाला भाजपच्या वरिष्ठांनी संधी दिली. आता भाजपचे 133 हून अधिक आमदार स्वतःचे आहे. त्यामुळे आम्ही किती मागावे? काय मागावे? याचे भान ठेवलं पाहिजे,” असे मत रामदास कदम यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला आहे. तर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार हे स्पष्ट झाले आहे. यावर रामदास कदम पुढे म्हणाले की, “आम्हा सर्वांचीच इच्छा की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. परंतु भाजपला देखील त्यांचा पक्ष चालवायचा आहे. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. महायुतीमध्ये कुठलाही मतभेद नाहीत,” असे मत रामदास कदम यांनी व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीमध्ये लागलेल्या धक्कादायक निकालामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय घेतला जात आहे. त्याबद्दल बोलताना रामदास कदम म्हणाले, “लोकसभेत त्यांना जास्त जागा मिळाल्या. जास्त खासदार निवडून आले. तेव्हा त्यांनी ईव्हीएम मशिनवर कुठे खापर फोडले का? नाही ना. मग आता विधानसभेत महायुतीच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे त्यांना कारण हवे आहे. बाजूने निकाल लागला की मशीन चांगले आणि विरोधात निकाल लागला की मशीन वाईट, असा कसा तुमचा निकष आहे,” असा प्रश्न रामदास कदम यांनी विचारला.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

दिल्लीमध्ये होणार मुख्यमंत्रिपदाचा निर्णय

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय दिल्लीमध्ये होणार आहे. निवडणुकीच्या पूर्वी झालेल्या चर्चांमध्ये देखील भाजप पक्षश्रेष्ठी यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याप्रमाणे आता सत्ता स्थापन करताना देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार व एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची रात्री बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्राचा पुढील पाच वर्षांचा कारभारी ठरवण्यात येणार आहे.

Web Title: Ramdas kadam expressed his desire for eknath shinde to cm of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2024 | 04:27 PM

Topics:  

  • cm of maharashtra
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?
1

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी
2

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी

शिवसैनिकांनो गाफील राहू नका, 128 जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करा; खासदार बारणे यांच्या सूचना
3

शिवसैनिकांनो गाफील राहू नका, 128 जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करा; खासदार बारणे यांच्या सूचना

ठाण्यात भाजपला मोठा धक्का; रवींद्र चव्हाणांच्या कार्यपद्धतीला कंटाळून 5 नगरसेवकांनी उचलले मोठे पाऊल
4

ठाण्यात भाजपला मोठा धक्का; रवींद्र चव्हाणांच्या कार्यपद्धतीला कंटाळून 5 नगरसेवकांनी उचलले मोठे पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.