Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बटेंगे तो कटेंगे’भाजपाच्या घोषणेवर शिवसेनेचे मत काय? प्रचाराच्या अखेरीस एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

प्रचाराच्या तोफा थंडावत असताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घोटाळ्याचे अनेक आरोप केले.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 18, 2024 | 06:22 PM
Shiv Sena Eknath Shinde campaign ends press conference

Shiv Sena Eknath Shinde campaign ends press conference

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आला असून अवघा काही काळ हा प्रचारासाठी बाकी राहिला आहे. राज्यामध्ये बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांसाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे. तसेच राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ही यंदाची विधानसभा निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत असताना राजकारणाला उधाण आले आहे. अखेरच्या वेळेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

प्रचाराच्या सांगतावेळी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले की, “संपूर्ण राज्यामध्ये शक्य तेवढ्या जास्तीत जास्त सभा घेतल्या. सगळ्या सभांमध्ये एकच उत्साह व जल्लोष होता. सरकारने सव्वा दोन वर्षामध्ये केलेली सर्व कामं आणि महाविकास आघाडीने केलेला विरोध केला ते आम्ही लोकांसमोर मांडली. जलयुक्त शिवार योजना, अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो 3, कारशेड, समृद्धी महामार्ग जलसिंचनाचे प्रकल्प असे अनेक प्रकल्पामध्ये स्पीडब्रेकर लावण्याचे काम महाविकास आघाडीने केले,” असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

लोकांच्या चेहऱ्यावर सुद्धा समाधान

पुढे ते म्हणाले की, “माझं महाविकास आघाडीला खुलं आव्हान होतं. तुम्ही अडीच वर्षांमध्ये काय केलं ते सांगा आम्ही सव्वा दोन वर्षांमध्ये काय केलं ते सांगतो. होऊन जाऊ द्या समोरासमोर. राज्याच्या हिताचे जे त्यांनी बंद पाडलेले प्रकल्प आम्ही पुन्हा सुरु केले. मी होतो तेव्हा यांच्या सरकारने फक्त 4 सिंचनाच्या प्रकल्पांना मान्यता दिली. आम्ही महायुती सरकारने 124 प्रकल्पांना मान्यता दिली. आम्ही जे दोन वर्षामध्ये काम केलं याचं आम्हाला समाधान आहे. हे लोकांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत आहे. आमच्या कामावर जनता खुष आहे. ते आम्हाला मतदानरुपी आशिर्वाद देणार आहेत,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

पुढे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “महाराष्ट्र लुटायला यांना महाराष्ट्राची तिजोरी कमी पडत होती. हे खरे दरोडेखोर आहेत. मातोश्रीवरुन तिजोरी मागून घ्यायला पाहिजे होती. त्यात खूप काही निघालं असतं. हा त्यांचा बालीशपणा आहे. अदानी यांना आम्ही जमीन दिलेली नाही. आम्ही जमीन डीआरपीला दिलेली आहे. ते दोन लाख लोकांना घरं देण्याचं काम होत आहे. उबाठा सरकारने जे पात्र आहेत त्यांना घरं देण्यात येतील असे सांगितले आहे. 60 हजार लोकांना घरं देण्याचा निर्णय उबाठाचा तर 2 लाख लोकांना घरं देण्याचा निर्णय आमचा आहे,” असे मत एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या सभेमध्ये मांडले आहे.

‘बटेंगे तो कटेंगे’ या भाजपच्या घोषणेवर देखील एकनाथ शिंदे यांनी मत व्यक्त केले. “या घोषणेचा अर्थ वाकडा का घेत आहेत. सरळ घ्या ना. जर नरेंद्र मोदी म्हणत आहेत की एक आहे तर सेफ आहे. तर काय एक होऊ नये का? एक होऊन मतदान करु नये का? या देशाला आणि राज्याला सुरक्षिता हवी असेल तर एकजूट असली पाहिजे. विदेशामध्ये जाऊन त्यांचे नेते देशाची बदनामी करत आहेत. आणि पाकिस्तानचे गोडवे गात आहेत. काश्मीरमधील 370 कलम हटवा म्हणून बोलत आहेत. म्हणून एकजूट पाहिजेत,” असे मत एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या प्रचारसभेमध्ये व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एकनाथ शिंदे म्हणाले की, “मागच्या 15 वर्षांमध्ये मुंबईचं वाटोळ कोणी केलं. खड्ड्यामधून प्रवास करायला लावला. त्यांना काळ्याचं पांढरं आणि पांढऱ्याचं काळ करायला लागतं. साडे तीन हजार लाख रुपये खर्च केले. हे कोणाचे पैसे खर्च केले. आम्ही खड्डेमुक्त मुंबई करण्याचा आमचा मानस आहे. कोव्हिडमध्ये पैसे खाल्ले यांनी…खोटं कोव्हिड सेंटर दाखवून पैसे खाल्ले. खिचडीमध्ये घोटाळा केला. हे पाप आहे. याचा जवाब यांना विधानसभा निवडणुकीमध्ये द्यावा लागेल,” असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रचाराच्या शेवटच्या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.

Web Title: Shiv sena eknath shinde campaign ends press conference news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 06:22 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Assembly election 2024
  • shivsena

संबंधित बातम्या

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
1

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

Ganesh Naik on Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी पण..; गणेश नाईकांनी आरसा दाखवला
2

Ganesh Naik on Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी पण..; गणेश नाईकांनी आरसा दाखवला

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पसायदानाद्वारे अखिल…”;
3

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पसायदानाद्वारे अखिल…”;

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?
4

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.