
फोटो सौजन्य - Social Media
काय म्हणाला अतुल कुलकर्णी?
अभिनेत्याने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून देशाच्या तरुणांना जागरूक केले आहे. पोस्टच्या माध्यमातून तो म्हणाला आहे की, “प्रिय तरुण नागरिकांनो, उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमचा आवाज पोहोचवण्यासाठी आणि तुमचे हक्क ठसवण्यासाठी सज्ज होताहात. माझ्या पिढीनं, आणि माझ्या आधीच्या आणि नंतरच्या काही पिढ्यांनीसुद्धा, आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, असं नेहमीच झालेलं नाही. आम्ही चुका केल्या आहेत, अनेक बाबतीत खूप मोठी आव्हानं तयार करून ठेवली आहेत. आणि आता हा ‘वारसा’ तुम्हाला मिळालाय. त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ ह्या देशाचा प्राण आहेत. तुम्ही सचोटीनं आणि सर्वांच्याच प्रती करूणा ठेऊन ह्या समाजाला, ह्या देशाला नव्यानं आकार द्याल अशी आशा मी मनापासून बाळगून आहे.तुम्हा सर्वांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा… – अतुल कुलकर्णी.”
एकंदरीत, उद्या NEET पेपरफुटी संदर्भात दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन होणार आहे. हे आंदोलन देशात नव्याने उभा राहिलेल्या ‘Cockroach Janata Party’ द्वारे आयोजित असून देशातील विविध क्षेत्रातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. आधी सोनम वांगचुक यांनी पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार प्रकाश राज खास या आंदोलनासाठी शूटिंग सोडून दिल्लीत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता, अतुल कुलकर्णीने या आंदोलनाला समर्थन जाहीर केले असून त्याने देशातील प्रत्येक युवाला या आंदोलनाचे समर्थन करण्याची मागणी केली आहे.
या आंदोलनाची मुख्य मागणी Neet Paperleak प्रकरणामुळे शिक्षण खात्यातील मंत्र्यांनी त्यांचा पदाचा राजीनामा देणे अशी आहे.