
फोटो सौजन्य - Social Media
कसे असणार शुभंकर तावडेचे पात्र?
शुभंकर तावडे आलोक सूर्यवंशी नावाचे पात्र साकारणार आहे. शुभंकर दिसायला देखणा असा दाखवण्यात आला आहे परंतु त्याचा स्वभाव जरा गुंतागुंतीचा दाखवण्यात आला आहे. त्याला मोठ्या आवाजाची भीती वाटते, जर काही गोष्टी त्याच्या मनाविरुद्ध घडल्या तर त्याला त्या सहन होत नाहीत. एकंदरीत, त्याचा स्वभाव इतका गुंतागुंतीचा आहे की स्वतःला इजा पोहचवायलाही तो मुलगा मागेपुढे पाहत नाही.
कसे असणार आशय कुलकर्णीचे पात्र?
अभिनेता आशय कुलकर्णीने आरव सूर्यवंशीचे पात्र साकारले आहे. परदेशातून शिक्षण घेऊन आलेला आरव स्वभावाने समजूतदार आहे. समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचे कौशल्य त्यात उत्तम आहे. आरवचा त्याच्या मोठ्या भावावर आलोक सूर्यवंशीवर जीवापाड प्रेम आहे.
काय आहे दोन्ही अभिनेत्यांचे म्हणणे?
शुभंकर तावडे म्हणतो की, ““टेलिव्हिजन या माध्यमाबद्दल मला कायमच विशेष आदर वाटतो, कारण माझ्या अभिनय प्रवासाची सुरुवात याच माध्यमातून झाली. गेल्या काही काळात चित्रपट आणि वेब सीरिजच्या कामांमध्ये व्यस्त असल्याने मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही. मात्र ‘पाठराखीण’मधील भूमिका माझ्यासमोर आली आणि पहिल्याच क्षणी ती मला खूप आवडली. अशा प्रकारचं पात्र साकारण्याचं धाडस सहसा फार कमी कलाकार करतात. आलोक हा नेहमीसारखा टिपिकल हिरो नसून त्याच्या व्यक्तिरेखेचे विविध पैलू प्रेक्षकांना हळूहळू पाहायला मिळतील.”
आशय कुलकर्णी म्हणाला की, “आरव हा परदेशातून शिक्षण पूर्ण करून आलेला, समजूतदार आणि कुटुंबातील सगळ्यांचा लाडका मुलगा आहे. आपल्या मोठ्या भावावर म्हणजेच आलोकवर त्याचं मनापासून प्रेम असून त्याच्याशी त्याचं खास नातं आहे. शांत स्वभाव आणि समोरच्याच्या भावना समजून घेण्याची वृत्ती ही आरवची जमेची बाजू आहे. शुभंकर माझा खूप जवळचा मित्र असला तरी आम्हाला याआधी एकत्र काम करण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, या मालिकेमुळे ती इच्छा पूर्ण झाली. प्रेक्षक या मालिकेला भरभरून प्रेम देतील, असा मला विश्वास आहे.”