
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
झी मराठीवरील वीण दोघांतली ही तुटेना ही मालिका सध्या एक वेगळ्याच वळणावर आहे. मालिकेत अंशुमनच्या लग्नाचा सीक्वेन्स चालू होणार आहे. खरंतर, स्वानंदी पहिल्यापासून या सगळ्याच्या विरोधात आहे. कारण तिला अंशुमन आणि मल्लिकाचा स्वभाव माहिती आहे. समरमुळे ती या लग्नात आनंदाने सहभागी व्हायला तयार होते. यादरम्यान वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. स्वानंदीची अखेर खरी ठरल्याचे दिसत आहे.
झी मराठीने एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. ज्यात दिसत आहे की स्वानंदीच्या हाती चिंगीचे रिपोर्ट लागले आहेत. चिंगी ही राजवाडेंच्या घरात घर काम करत असते. समर-स्वानंदीसह आजीचा चिंगीवर विश्वास आहे. पण, अंशुमनच्या मनात पहिल्या दिवसापासून चिंगीबद्दल आकर्षण आहे.ज्यावेळी समर तिला सर्वांना दादा म्हण असं सांगतो, तेव्हाही ते अंशुमनला पटलेलं नसतं.
नवीन आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की स्वानंदीला ज्या गोष्टीची भीती असते ती आता खरी होणार आहे. चिंगी गरोदर असून, तिच्या पोटात अंशुमनचं बाळ वाढत आहे. आता स्वानंदीच्या हाती चिंगाचे प्रेग्नन्सी रिपोर्टस लागले आहेत.हे रिपोर्टस पाहून स्वानंदीला धक्का बसतो.ती याबद्दल चिंगाला जाबही विचारते.“अगं मुली तू काय केलंयस तुला कळतंय का?” यावर चिंगी हतबल होत स्वानंदीलाच विचारते की, “आता मी काय करू?” यावर अंशुमन-चिंगीचं लग्न लावून द्यायचं हा एकमेव मार्ग स्वानंदीसमोर असतो.
“अगं मुली, तू काय केलंयस तुला कळतंय का?” असे म्हणत स्वानंदी चिंगीला जाब विचारते. चिंगी मात्र पूर्णपणे हतबल झालेली असते. घडलेल्या प्रकारामुळे ती घाबरून स्वानंदीलाच, “आता मी काय करू?” असा प्रश्न विचारते. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता, अंशुमन आणि चिंगीचं लग्न लावून देणं हाच एकमेव मार्ग असल्याचं स्वानंदीला वाटू लागते. त्यामुळे मालिकेच्या कथानकात नवा गुंता निर्माण होणार असून, राजवाडे कुटुंब या निर्णयावर कशी प्रतिक्रिया देणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते, स्वानंदी चिंगीली घेऊन लग्नमंडपात घेऊन जाते आणि अंशुमचं लग्न थांबवताना दिसते.स्वानंदी म्हणते, ” थांबा! हे लग्न होऊ शकत नाही. काकू… या घराची लाज तुमचा मुलगा घालवतोय. “राजवाडे, आय अॅम सॉरी… पण हे लग्न होऊच शकत नाही!” स्वानंदीच्या या वक्तव्यामुळे लग्नमंडपात एकच खळबळ उडते. लग्नाच्या ऐनवेळी घेतलेल्या या भूमिकेमागचं कारण काय, याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता निर्माण होते. आता स्वानंदी चिंगी प्रेग्नंट असल्याचं सत्य सर्वांसमोर उघड करणार का, की आधी समरला विश्वासात घेऊन संपूर्ण घडामोडींची माहिती देणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निर्णयामुळे राजवाडे कुटुंबावर काय परिणाम होणार आणि पुढे कथानक कोणतं वळण घेणार, हे मालिकेच्या आगामी भागांत उलगडणार आहे.
‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेतील हा बहुचर्चित विशेष भाग १ जून रोजी सायंकाळी ७:१५ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रोमो प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून नेटकऱ्यांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
प्रोमोमधील धक्कादायक घडामोडींमुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. “ये हुई ना बात… अंशुमन-अर्पिताचं भांडं फुटणार”, “स्वानंदी रॉक्स”, “आता खरी मजा येणार”, “काकूचा इगो आणि माज स्वानंदी उतरवेल”, “चिंगी गरोदर असल्यामुळे अंशुमन-चिंगीचं लग्न होईल”, “लग्न झाल्यावर अजून मजा येईल”, “काकूची जिरणार” अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
स्वानंदी पुढे कोणता निर्णय घेणार, चिंगीच्या आयुष्यातील या मोठ्या वळणाचा परिणाम काय होणार आणि राजवाडे कुटुंबावर याचे काय पडसाद उमटणार, याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.