
tejashree pradhan
समरची काकू मल्लिका हिला स्वानंदी पहिल्याापासूनच आवडत नव्हती पण तरी देखील समर स्वानंदीशी लग्न करतो. स्वानंदीला घराबाहेर काढण्यासाठी मल्लिका काकू आणि तिचा मुलगा अंशुमन अनेक कारस्थान करतात मात्र त्यांचा प्रत्येक डाव स्वानंदी मोठ्या हुशारीने उधळून लावते. मात्र स्वानंदीवर आता आलेलं संकट ती कसं पेलणार आहे हा एक प्रश्न उरतो.
मालिकेचा टीआरपी वाढत असाताना मालिकेतील आता मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
मालिकेला नवा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आलेेला आहे. या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं त्यानुसार, अंशुमन समरच्या कपाटातून पैसैनआणि चैन चोरतो आणि त्याचवेळी स्वानंदीचे बाबा अंशुमनला पाहतात. त्यानंतर स्वानंदीचे बाबा अंशुमनला म्हणतात की, तुम्ही समररावांच्या कपाटातून चैन आणि पैसे काढलेत हे जसंं मला माहितेय तसं समररावांना माहित आहे का ? एवढं बोलून स्वानंदीचे बाबा तिथून निघणार तेच अंशुमन स्वानंदीच्या वडीलांना ढकलून देतो. त्यांनतर स्वानंदीला एक फोन येेतो आणि सांगितलं जातं की, तुमच्या वडीलांना अपघात झाला आहे . स्वानंदीचे वडिला तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतात.
अंशुमनच्या या कारस्थानाचा परिणाम स्वानंदीच्या वडीलांच्या जेवावर बेतलं असल्याचं प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंं आहे. मालिकेचा हा भाग 25 मे म्हणजेच आज रात्री 7.15 ला पाहता येणार आहे. वडिलांना झालेली दुखापत ही अपघात नसून घातपात आहे हे स्वानंदीला कळणार का ? अंशुमनचं कटकारस्थान स्वानंदी सगळ्यांसमोर आणणार का हे आता येणाऱ्या काही भागांमधून पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
वेब सिरीजच्या प्रभावाखाली मराठी रंगभूमी; डिजिटल पिढीच्या आवडीनुसार नाटकांच्या मांडणीत नवनवे प्रयोग