
अमित शाह यांचा नक्षलवादावर लोकसभेत कडक प्रहार (Photo Credit- X)
अमित शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले की, एकेकाळी 12 राज्यांमध्ये पसरलेला ‘रेड कॉरिडॉर’ आता आकुंचन पावत आहे. “आज बस्तरमधून नक्षलवाद जवळपास संपला आहे. तिथे प्रत्येक गावात शाळा बांधण्याची आणि रेशन दुकाने उघडण्याची मोहीम राबवण्यात आली आहे. 70 वर्षांपासून ज्या आदिवासी भागापर्यंत विकास पोहोचला नव्हता, तिथे आता मोदी सरकारच्या योजना पोहोचत आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
“Yeh Modi Sarkar hai.. jo hatyar uthayega, usko hisaab dena padega” – Clear message from Amit Shah 🔥#NaxalFreeIndia pic.twitter.com/kXnWT6KVx5 — Shilpa (@shilpa_cn) March 30, 2026
India Census 2027: देशाच्या जनगणनेचे बिगुल वाजले! एप्रिल २०२६ पासून पहिल्या टप्प्याला सुरुवात
विरोधकांवर निशाना साधताना अमित शाह म्हणाले की, “2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर देशातील प्रत्येक गरिबाला घर, गॅस, शुद्ध पाणी आणि 5 लाखांचा आरोग्य विमा मिळाला. मात्र, बस्तरमधील जनता यापासून का वंचित राहिली होती? कारण तिथे नक्षलवादाची सावली होती. तुम्ही 60 वर्षे राज्य केले, मग आदिवासींना हक्काचे घर, पाणी आणि बँकिंग सुविधा का देऊ शकला नाही? आधी स्वतःच्या कारभाराकडे डोकावून पहा,” असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.
मोदी सरकारने नक्षल प्रभावित भागात केवळ लष्करी कारवाईच केली नाही, तर विकासाचे जाळेही विणले आहे. अमित शाह यांच्या मते, नक्षलग्रस्त भागात रस्ते, वीज आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर भर. तसेच, बस्तरमधील दुर्गम भागात शाळा आणि आरोग्य केंद्रांचे जाळे. आणि गरिबांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्य आणि विमा कवच.
गृहमंत्री शाह यांनी स्पष्ट केले की, लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. जे लोक विकासात अडथळा आणतील आणि शस्त्र उचलून निष्पाप नागरिकांचा बळी घेतील, त्यांच्यावर सरकार कोणतीही दया दाखवणार नाही. मोदी सरकारच्या कार्यकाळात नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाचे प्रमाण वाढले असून, हिंसाचारात मोठी घट झाली असल्याचेही त्यांनी आकडेवारीसह स्पष्ट केले.
Nitin Nabin Resignation : खासदारकीचा मान, आमदारकीला निरोप; राजीनामा देताना नितीन नबीन भावूक