Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Violence: बांगलादेशात हिंदूंचे रक्त सांडले! प्रियांका गांधी अस्वस्थ; न्यायाच्या मागणीला काँग्रेसचा आक्रोशाचा स्वर

Dipu Das : बांगलादेशमधील परिस्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण बनली आहे. निवडणुकीपूर्वी अनेक शहरांमध्ये जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. राजकीय कार्यकर्ते उस्मान हादी यांच्या हत्येनंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 20, 2025 | 11:33 AM
Priyanka Gandhi urges Centre to act after Hindu youth lynched in Bangladesh

Priyanka Gandhi urges Centre to act after Hindu youth lynched in Bangladesh

Follow Us
Close
Follow Us:
  •  बांगलादेशातील मैमनसिंगमध्ये २५ वर्षीय हिंदू तरुण दिपू चंद्र दास याची ईशनिंदेच्या खोट्या आरोपाखाली जमावाने निर्घृण हत्या केली.
  •  काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून मोदी सरकारने बांगलादेश सरकारकडे हा मुद्दा आक्रमकपणे मांडावा, अशी मागणी केली आहे.
  •  केवळ हिंदूच नाही तर ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी भारताने तातडीने राजनैतिक पावले उचलावीत, असे आवाहन काँग्रेस नेत्यांनी केले आहे.

Priyanka Gandhi on Bangladesh Hindu man lynched : शेजारील देश बांगलादेशातील (Bangladesh) परिस्थिती आता मानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडताना दिसत आहे. शेख हसीना (Sheikh Hasina) यांचे सरकार पडल्यानंतर तिथे सुरू झालेला हिंदूंवरील अत्याचाराचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाहीये. ताज्या घटनेत, मैमनसिंग शहरात एका २५ वर्षीय हिंदू कामगाराला केवळ ‘ईशनिंदे’च्या आरोपावरून जमावाने ठेचून मारले आणि त्याचा मृतदेह जाळला. या घटनेने संपूर्ण भारत हादरला असून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी केंद्र सरकारला या प्रकरणी कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.

दिपू दासची क्रूर हत्या: नेमकं काय घडलं?

२५ वर्षीय दिपू चंद्र दास हा एका कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत होता. शुक्रवारी त्याच्यावर ईशनिंदेचा आरोप करत एका उन्मत्त जमावाने त्याला घेरले. त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. संतापजनक बाब म्हणजे हत्येनंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला. ही घटना केवळ एका व्यक्तीची हत्या नसून ती बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या असुरक्षिततेचे भयावह प्रतीक बनली आहे. प्रियांका गांधी यांनी ही बातमी “अत्यंत अस्वस्थ करणारी” असल्याचे सांगत याला मानवतेविरुद्धचा गुन्हा म्हटले आहे.

“Extremely alarming”: Priyanka Gandhi urges Centre to take cognisance of increasing violence against Hindus in Bangladesh Read @ANI story | https://t.co/y0USa7WEGR#PriyankaGandhi #Centre #Bangladesh #Hindus pic.twitter.com/Xysy0CpqA4 — ANI Digital (@ani_digital) December 19, 2025

credit : social media and Twitter

प्रियांका गांधी आणि अशोक गेहलोत यांचा केंद्रावर निशाणा

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर आपली संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, “कोणत्याही सुसंस्कृत समाजात धर्म किंवा ओळखीच्या आधारावर हत्या करणे स्वीकारार्ह नाही. भारत सरकारने बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराची गांभीर्याने दखल घ्यावी.” दुसरीकडे, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही मोदी सरकारवर टीका केली आहे. “एवढ्या गंभीर मुद्द्यावर केंद्र सरकार मूक प्रेक्षक म्हणून का बसले आहे?” असा सवाल त्यांनी केला. भारताचे हे मौन बाह्य शक्तींना बळ देत असून, सरकारने तातडीने राजनैतिक हस्तक्षेपाद्वारे तिथल्या हिंदूंच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी गेहलोत यांनी केली आहे.

बांग्लादेश में हिंदू युवक दीपू चंद्र दास की भीड़ द्वारा बर्बरतापूर्ण हत्या का समाचार अत्यंत चिंताजनक है। किसी भी सभ्य समाज में धर्म, जाति, पहचान आदि के आधार पर भेदभाव, हिंसा और हत्या मानवता के खिलाफ अपराध है। भारत सरकार को पड़ोसी देश में हिंदू, ईसाई और बौद्ध अल्पसंख्यकों के… — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 19, 2025

credit : social media and Twitter

बांगलादेशातील अल्पसंख्याकांचे भवितव्य टांगणीला

ऑगस्ट २०२४ मध्ये सत्तापालट झाल्यानंतर बांगलादेशातील हिंदू लोकसंख्येला सतत लक्ष्य केले जात आहे. घरांची जाळपोळ, मंदिरांची तोडफोड आणि आता थेट ‘मॉब लिंचिंग’ सारख्या घटनांनी तिथल्या अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने या घटनेचा निषेध केला असला आणि “गुन्हेगारांना सोडणार नाही” असे आश्वासन दिले असले तरी, प्रत्यक्षात हिंसाचार थांबताना दिसत नाहीये. बांगलादेशातील हिंदूंची परिस्थिती आता केवळ त्या देशाचा अंतर्गत मुद्दा राहिलेला नाही. भारतासाठी ही चिंतेची बाब असून, प्रियांका गांधी आणि काँग्रेसने उपस्थित केलेले प्रश्न मोदी सरकारसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव वाढवणारे ठरत आहेत. आता केंद्र सरकार यावर काय ठोस कृती करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशात हिंदू तरुणाची हत्या का करण्यात आली?

    Ans: मैमनसिंग येथील २५ वर्षीय दिपू चंद्र दास या हिंदू तरुणावर ईशनिंदेचा (Blasphemy) खोटा आरोप करून जमावाने त्याची 'मॉब लिंचिंग'द्वारे हत्या केली.

  • Que: प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारकडे काय मागणी केली आहे?

    Ans: भारत सरकारने बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा मुद्दा बांगलादेश सरकारकडे जोरदारपणे आणि तातडीने मांडावा, अशी मागणी केली आहे.

  • Que: बांगलादेश सरकारची यावर काय प्रतिक्रिया आहे?

    Ans: बांगलादेशच्या अंतरिम सरकारने या हत्येचा निषेध केला असून या प्रकरणातील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे.

Web Title: Bangladesh hindu man lynched priyanka gandhi reaction marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 11:33 AM

Topics:  

  • Bangladesh Crisis
  • Bangladesh violence
  • BJP
  • National Congress Party
  • Priyanka Gandhi

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Mayor: छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा झेंडा फडकला! समीर राजूरकर महापौर तर राजेंद्र जंजाळ उपमहापौर
1

Chhatrapati Sambhajinagar Mayor: छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा झेंडा फडकला! समीर राजूरकर महापौर तर राजेंद्र जंजाळ उपमहापौर

Panchayat Samiti Election : वावंजा पंचायत समितीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांची मोठी गर्दी
2

Panchayat Samiti Election : वावंजा पंचायत समितीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांची मोठी गर्दी

Kolhapur : रस्ते, महिलांची सुरक्षा अन्…; महापौरपदी निवड होताच निकम यांची मोठी माहिती
3

Kolhapur : रस्ते, महिलांची सुरक्षा अन्…; महापौरपदी निवड होताच निकम यांची मोठी माहिती

Mumbai Mayor : अखेर भाजपकडून महापौरपदाची घोषणा, तर उपमहापौर शिवसेनेचे संजय घाडी
4

Mumbai Mayor : अखेर भाजपकडून महापौरपदाची घोषणा, तर उपमहापौर शिवसेनेचे संजय घाडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.