Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपा का आहे नव्या मतदारांच्या शोधात? 2024 च्या निवडणुकीत धक्का बसण्याची भीती आहे का? राष्ट्रीय कार्यकारिणीत का मुद्दा चर्चेत?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत (National Executive Meeting) बैठकीत सांगितल्याप्रमाणं लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Election) अवघे ४०० दिवस राहिलेले आहेत. अशा स्थितीत लोकसभा निवडणुका जिंकायच्या असतील तर नवा मतदार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, हे भाजपाच्या धुरिणांना कळून चुकलेलं दिसतंय.

  • By साधना
Updated On: Jan 20, 2023 | 12:57 PM
nadda modi and shah

nadda modi and shah

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भाजपाच्या (BJP) दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत (National Executive Meeting) नव्या मतदारांपर्यंत पोहचा, हा संदेश अगदी स्पष्टपणे देण्यात आलाय. नवी व्होट बँक(Vote Bank) तयार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास सांगण्यात आलंय. या वर्षभरात देशात कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान यांसारख्या मोठ्या राज्यांसह ९ राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बैठकीत सांगितल्याप्रमाणं लोकसभा निवडणुकीला अवघे ४०० दिवस राहिलेले आहेत. अशा स्थितीत लोकसभा निवडणुका जिंकायच्या असतील तर नवा मतदार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, हे भाजपाच्या धुरिणांना कळून चुकलेलं दिसतंय. यासाठी वय वर्ष १८ ते वय वर्ष २५ वयोगटातील तरुण-तरुणींना पक्षाशी जोडून घेण्याबाबत सांगण्यात आलं आहे. सर्व जाती-धर्माच्या मतदारांपर्यंत पोहचण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

[read_also content=”शाहिद कपूरच्या घरात कार्तिक आर्यन मांडणार बिऱ्हाड,दर महिन्याचं भाडं ऐकलंत तर येईल चक्कर https://www.navarashtra.com/movies/shahid-kapoor-rents-out-his-apartment-in-juhu-to-kartik-aaryan-for-7-lakhs-per-month-nrsr-363133.html”]

२०१४ ते २०२३ परिस्थितीत काय झालाय बदल ?
भाजपा २०१४ साली जेव्हा प्रचंड बहुमतानं सत्तेत आली होती, त्यावेळी त्यात तरुणांचा वाटा खूप मोठ्या प्रमाणावर होता. त्यावेळी पक्षाकडून सोशल मीडियाचा प्रचंड वापर करण्यात आला होता. तरुणांच्या स्वप्नांना पक्षाच्या वचननाम्यात महत्त्वाचं स्थान देण्यात आलं होतं. तरुणांनीही भाजपावर विश्वास टाकत भाजपाच्या पारड्यात भरभरुन मतदान केलं. त्यानंतर २०१९ सालीही पुन्हा एकदा राक्षसी बहुमतानं भाजपा सत्तेत पुनरागमन करु शकली. दहा वर्षांपूर्वी ज्या तरुणांनी आशेनं मोदी सरकारला मतदान केलं होतं. ती पिढी आता त्यांच्या वयाच्या स्थिरावलेल्या टप्प्यावर आहे. मात्र २०२३ मधील परिस्थिती अजून वेगळी आहे. सोशल मीडियावर सरकारविरोधात थोडीफार का होईना अँटी इक्म्बन्सी दिसू लागली आहे. बेरोजगारी, महागाई याची चर्चा सोशल मीडियावर वाढली आहे. विरोधकांनाही सोशल मीडियाचं हत्यारं आता भाजपामुळं गवसलं आहे.

नव्या तरुणाईला साद देणार?
इतिहासात डोकावून पाहिलं तर निवडणुका असो वा आंदोलन, ज्यात तरुणांचा सहभाग असेल, तरुणाईची साथ ज्यांना असेल त्यांनाच यश मिळताना आत्तापर्यंत दिसलं आहे. युवा वर्ग भविष्याचं स्वप्न पाहतात आणि त्याची तुलनाही करीत असतात. त्यामुळेच भाजपा सध्या नव्या तरुणाईला हाक देण्याच्या प्रयत्नात आहे. युवकांची दुसरी पिढी भाजपाला आकृष्ट करायची इच्छा आहे. या तरुणाईला मागची काँग्रेसची राजवट माहित नव्हती, त्याची माहिती त्यांना व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. देशात कुशासन ते सुशासन असा प्रवास झाल्याचं तरुणाईच्या मनावर ठसवण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे.

दक्षिणेचे मोठे आव्हान
भाजपाला २०१४ आणि २०१९ मध्ये मिळालेल्या बंपर यशाची पुनरावृत्ती २०२४ साली होणार का, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येतेय. त्यासाठी १६० लोकसभा मतदारसंघ जिथं भाजपा जिंकू शकलेली नाही, त्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येतं आहे. जम्मू-काश्मीर, प. बंगाल, ओरिसा, तामिळनाडू यासारख्या राज्यांकडे विशेष लक्ष देण्यात येतंय. दक्षिण भारतात पाय रोवण्यासाठी भाजपा प्रयत्न करते आहे. दक्षिण भारतात भाजपाच्या आणि नव्या मित्रपक्षांच्या जागा वाढल्या तर त्याचा फायदा भाजपाला होणार आहे.

सर्वधर्मियांना सोबत घेण्याची भाषा कशासाठी
उत्तर भारतात होणारं नुकसान द. भारतातून भरुन काढण्याच्या प्रयत्नात भाजपा आहे. सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन चालण्यास पंतप्रधानांनी सांगितले त्यामागाचं एके कारण हेही आहे. मुस्लिमांनाही सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. दक्षिणेवर लक्ष ठेवत तामिळ-काशी संगमसारखे कार्यक्रमही आयोजित करण्यात येतायेत. सीमावर्ती भागात संपर्क वाढवण्याचं आवाहन भाजपाच्या नेत्यांना करण्यात आलंय. प्राथमिक सदस्यांचे मेळावे घेून भाजपाचा जनाधार अधिक पक्का करण्याचा प्रयत्नही करण्यात येणार आहे. हिंदुत्ववादी पक्ष या भूमिकेतून सर्वसामान्यांचा पक्ष होण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरु आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी विकास, राष्ट्रवाद आणि सगळ्यांची साथ हाच मंत्र त्यासाठी पक्षश्रेष्ठींनी ठरवलेला दिसतोय.

Web Title: Bjp is finding new voters election discussion done in nationa meeting nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2023 | 12:51 PM

Topics:  

  • BJP
  • delhi
  • LOKSABHA ELECTION
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Suvendu Adhikari: एकेकाळी होते ममतांचे ‘उजवा हात’, मग सुवेंदू अधिकारींच्या हाती कसे आले ‘कमळ’? जाणून घ्या वादाचे खरे कारण
1

Suvendu Adhikari: एकेकाळी होते ममतांचे ‘उजवा हात’, मग सुवेंदू अधिकारींच्या हाती कसे आले ‘कमळ’? जाणून घ्या वादाचे खरे कारण

देशभर दंगली घडवण्याचे भाजपचे षडयंत्र, पश्चिम बंगालमधील दंगली हे पहिले पाऊल; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप
2

देशभर दंगली घडवण्याचे भाजपचे षडयंत्र, पश्चिम बंगालमधील दंगली हे पहिले पाऊल; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

राजतिलक की करो तयारी! Suvendu Adhikari होणार मुख्यमंत्री; पश्चिम बंगालमध्ये उद्यापासून ‘भाजपपर्व’
3

राजतिलक की करो तयारी! Suvendu Adhikari होणार मुख्यमंत्री; पश्चिम बंगालमध्ये उद्यापासून ‘भाजपपर्व’

‘महाराष्ट्रात राज्यपालांनी आकडे मोजले होते का?’; तामिळनाडूच्या राजकीय संघर्षावरुन अरविंद सावंतांचा भाजपवर घणाघाती वार
4

‘महाराष्ट्रात राज्यपालांनी आकडे मोजले होते का?’; तामिळनाडूच्या राजकीय संघर्षावरुन अरविंद सावंतांचा भाजपवर घणाघाती वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.